Rahul Gandhi राहुल गांधींविरुद्ध झारखंडमधील न्यायालयाकडून अजामीनपात्र वॉरंट जारी
झारखंडमधील चाईबासा येथील मानहानीच्या खटल्यामुळे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या अडचणी वाढू शकतात.
झारखंडमधील चाईबासा येथील मानहानीच्या खटल्यामुळे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या अडचणी वाढू शकतात.
भारताच्या परराष्ट्र आणि संरक्षण धोरणाच्या दृष्टीने निर्णायक ठरलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ ने पाकिस्तानला लज्जास्पद पराभवाची चव चाखवली. भारताने केवळ दहशतवाद्यांवर प्रहार केला नाही, तर जगाला स्पष्ट संदेश दिला की, भारत आता कारवाई करतो, शब्दांवर नाही, कृतीवर विश्वास ठेवतो. मात्र, या ऐतिहासिक यशाच्या पार्श्वभूमीवरही काँग्रेसने आपले क्षुद्र राजकारणाचे शस्त्र म्यान केलेले दिसत नाही.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी गुरुवारी ७ तास बिहारमध्ये राहिले. प्रशासनाची परवानगी न घेता ते दरभंगा येथील वसतिगृहात पोहोचले आणि १२ मिनिटे स्टेजवरून विद्यार्थ्यांना संबोधित केले.
लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काँग्रेसने केलेल्या चुकांची जबाबदारी आपण घेतो असे इंग्लंडमध्ये सांगून आपल्या राजकीय मोठेपणाचा आव आणून दाखविला. त्यामुळे त्यांच्या समर्थकांनी आनंद व्यक्त केला राहुल गांधी कसे जबाबदार नेते आहेत आणि ते चुका मान्य करून त्याची जबाबदारी देखील कशी घेतात याची वर्णने करणारे ट्विट आणि व्हिडिओ राहुल गांधींच्या समर्थकांनी सोशल मीडियावर शेअर केले. पण राजकीय वस्तुस्थिती पाहिली, तर राहुल गांधींनी चुकांची घेतलेली जबाबदारी आणि प्रत्यक्षात काँग्रेसने केलेल्या चुका आणि त्यामुळे सगळ्या देशाला चुकवावी लागलेली किंमत यातली फार मोठी विसंगती समोर येते.
राहुल गांधींनी १९८४ चे ऑपरेशन ब्लू स्टार ही चूक होती, हे मान्य केले. सुमारे दोन आठवड्यांपूर्वी, अमेरिकेतील ब्राउन विद्यापीठात एका कार्यक्रमादरम्यान, राहुल गांधींना ऑपरेशन ब्लू स्टारवर एक प्रश्न विचारण्यात आला.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून संसदेच्या दोन्ही सभागृहांचे विशेष अधिवेशन लवकरात लवकर बोलावण्याची विनंती केली आहे. पत्रात म्हटले आहे की, “या महत्त्वाच्या वेळी, भारताने हे दाखवून दिले पाहिजे की आपण दहशतवादाविरुद्ध नेहमीच एकजूट आहोत.”
स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील आक्षेपार्ह टिप्पणीबद्दल सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेस खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना फटकारले. शुक्रवारी न्यायालयाने म्हटले की, आम्ही कोणालाही स्वातंत्र्यसैनिकांविरुद्ध बाष्कळ बोलण्याची परवानगी देऊ शकत नाही. त्यांनी आपल्याला स्वातंत्र्य दिले आणि आपण त्यांच्याशी कसे वागतो आहोत?
लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने कडक शब्दांत फटकारले. स्वातंत्र्यसैनिक वीर सावरकर यांच्यावरील राहुल गांधींच्या वादग्रस्त विधानावर सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, देशातील स्वातंत्र्यसैनिकांवर बेजबाबदार भाष्य स्वीकारले जाणार नाही.
स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने आज जबरदस्त चपराक हाणली. देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांचा कोणत्याही स्थितीत अपमान सहन करणार नाही.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत फेरफार झाल्याचा आरोप करणाऱ्या राहुल गांधी यांच्यावर सडकून टीका केली आहे.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी काँग्रेसशासित हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना पत्र लिहून रोहित वेमुला कायदा लागू करण्याचे आवाहन केले. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर मुख्यमंत्री सुखू आणि रेवंत रेड्डी यांना लिहिलेले पत्र देखील शेअर केले.
स्वातंत्र्यवीर सावरकरांना माफीवीर म्हणून हिणवणाऱ्या राहुल गांधींनी सावरकरांचा एका मुलाखतीत पुन्हा अपमान केला. त्यांच्या कथित माफीनाम्यावरून नवे दावे करून इतिहासाची मोडतोड केली.
भारतात पंडित जवाहरलाल नेहरूंचे री ब्रॅण्डिंग करून राहुल गांधी अमेरिकेत पोहोचले. तिथे सॅम पित्रोदा यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. हे तेच सॅम पित्रोदा आहेत, जे शीख विरोधी दंगलीमध्ये शिखांचे शिरकाण झाल्याच्या घटनेला “हुआ तो हुआ” असे म्हणाले होते.
राहुल गांधींच्या तोंडून नेहरुंचे “री ब्रॅण्डिंग”; गांधीजींच्या सत्यशोधनाच्या जॅकेटचे “री फिटिंग”!!, असेच सत्य राहुल गांधींनी दिलेल्या नव्या मुलाखतीतून समोर आले.
बिहारमध्ये कन्हैया कुमारचे लॉन्चिंग करून दिल्लीत तेजस्वी यादवशी चर्चा; राहुल गांधींची “डबल गेम” भरणार का INDI आघाडीत ऊर्जा??, असा सवाल राहुल गांधींच्या राजकीय कृतीतून समोर आलाय.
होतील राहुल पंतप्रधान, त्या दिवशी चप्पल घालणार!!, अशी घनघोर भीष्म प्रतिज्ञा काँग्रेसच्या एका तरुण कार्यकर्त्याने केली आहे.
इकडे राहुल गांधींचे “री री री री री लॉन्चिंग” नीट होई ना, चालले बिहारमध्ये कन्हैया कुमारचे “लॉन्चिंग” करायला!! अशी अवस्था खरंच काँग्रेसची अहमदाबाद मधल्या महत्त्वाकांक्षी अधिवेशन नंतरही झाली आहे.
काँग्रेसचे ८४ वे अधिवेशन गुजरातमधील अहमदाबाद येथे होत आहे. ते दोन दिवसांसाठी (८ आणि ९ एप्रिल) आहे. राहुल गांधी अधिवेशनात म्हणाले- काही दिवसांपूर्वी भाजपने लोकसभेत वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर केले
सोमवारी बिहार राज्य कार्यालयात युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी गुंडगिरी केली. आत, राहुल गांधी विधानसभा निवडणुकीसंदर्भात जिल्हाध्यक्ष आणि नेत्यांसोबत बैठक घेत होते. दरम्यान, कार्यकर्ते बाहेर एकमेकांशी भिडले.
राहुल बाबांना (Rahul Gandhi) लोक उगाचच “सेक्युलर” समजतात, ते तर हिंदुत्ववादी मीडियाचे मोठे संवाहक निघाले!!,
जेनेटिकली मॉडीफाय BT cotton कॉटनला काँग्रेस प्रणित यूपीए सरकारने प्रोत्साहन दिले. त्या सरकारचे कृषिमंत्री शरद पवारांनी BT cotton मुळे कापसाचे उत्पादन आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न कसे वाढले
राहुल गांधी यांची याचिका लखनऊ उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. त्यांनी वीर सावरकर मानहानी खटल्यात लखनौ सत्र न्यायालयाच्या समन्स आदेशाला आणि २०० रुपयांच्या दंडाला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. उच्च न्यायालयाने त्यांना पर्यायी उपाय करण्याचा सल्ला दिला आहे आणि लखनौ सत्र न्यायालयात जाण्यास सांगितले आहे.
उत्तर प्रदेशातील संभळ येथील खासदार-आमदार न्यायालयाने विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना समन्स बजावले आहेत. न्यायालयाने त्यांना नोटीस बजावली आणि ४ एप्रिल रोजी न्यायालयात हजर राहण्याचे किंवा त्यांचे उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले. राहुल गांधी यांच्या एका विधानाविरुद्ध ही नोटीस बजावण्यात आली आहे.
लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज महाराष्ट्रातल्या मतदार याद्यांचा प्रश्न पुन्हा एकदा लोकसभेत उकरून काढला. राहुल गांधींनी साधारण महिनाभरापूर्वी खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार संजय राऊत यांच्याबरोबर महाराष्ट्रातल्या मतदार यादीवर ठळक प्रश्नचिन्ह लावणारी पत्रकार परिषद घेतली होती.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी अहमदाबाद येथे पक्षातील नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, गुजरातमध्ये काँग्रेस पक्षाला योग्य दिशा दाखवता आलेली नाही.