Pakistan : पाकिस्तानच दहशतवादाला पोसतोय अन् स्वतः पीडित असल्याचे जगाला भासवतो, भारताचा जाेरदार हल्लाबाेल
भारताने जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) व्यासपीठावरून पाकिस्तानवर थेट आणि तीव्र शब्दांत हल्लाबोल केला आहे. “पाकिस्तान हा जिहादी दहशतवादाचा केंद्रबिंदू आहे. तेथेच दहशतवादाचे बीज पेरले जाते आणि जगापुढे मात्र स्वतःला पीडित म्हणून सादर केले जाते,” अशी खरमरीत टीका भारताच्या स्थायी प्रतिनिधी अनुपमा सिंग यांनी केली.