• Download App
    Pakistan पाकिस्तानने पुन्हा केले नापाक कृत्य

    Pakistan : पाकिस्तानने पुन्हा केले नापाक कृत्य २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार

    Pakistan

    भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : Pakistan सध्या पाकिस्तानवर वॉटर स्टाइक आणि पॉलिटकल स्टाइक झाला आहे आणि पाकिस्तानची भीतीही समोर आली आहे. मात्र पाकिस्तानकडून कुरापती सुरूच आहेत, २४ तासांत दुसऱ्याता नियंत्रण रेषेवर गोळीबार केला गेला आहे. तर भारतीय जवानांनी या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले आहे.Pakistan

    दहशतवादाविरुद्धच्या नवीन भारताच्या आक्रमक रणनीतीचा विचार करता, पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी काहीतरी मोठी योजना आखण्यात आली आहे असे मानले जाते. दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींनी खुल्या व्यासपीठावर दिलेला इशारा हेच दर्शवित आहे आणि कदाचित यामुळेच पाकिस्तान पूर्णपणे हादरला आहे.



    पाकिस्तानमध्ये सर्वपक्षीय बैठका सतत होत आहेत. पाकिस्तानला भीती आहे की भारत इथून पुढे गप्प बसणार नाही आणि पुलवामामध्ये याची साक्ष दिली आहे, जेव्हा एअर स्टाइक करण्यात आला होता आणि त्याशिवाय बांदीपोरामध्ये लष्कर ए तोबाच म्होरक्या ज्या पद्धतीने मारला गेला होता.

    त्यानंतर, पाकिस्तानला समजले आहे की भारत येथे गप्प बसणार नाही. पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवादी आदिलचे घर अनंतनागमध्ये उडवून देण्यात आले. त्याच वेळी, आणखी एक दहशतवादी आसिफ शेखचा बेकायदेशीर लपण्याचा परिसरही उद्ध्वस्त करण्यात आला. हा फक्त पहलगामच्या सूडाचा ट्रेलर आहे. यावेळी दहशतवादी भूमी असलेल्या पाकिस्तानला कोणत्या प्रकारची वागणूक मिळणार आहे हे जाणून घेण्यासाठी संपूर्ण जग पंतप्रधान मोदींचे शब्द ऐकत आहे.

    Pakistan again commits heinous act firing on Line of Control for the second time in 24 hours

    महत्वाच्या बातम्या

     

    Related posts

    पतीचा पत्नीवर ॲसिड हल्ला; राष्ट्रीय महिला आयोगाने दखल घेत पोलिसांना दिले महत्वाचे आदेश!!

    Dhar Bhojshala : धारच्या भोजशाळेत पहिला शुक्रवार ठरला ऐतिहासिक; नमाज नाही, अखंड पूजा सुरू, आता पुढे काय?

    Rajya Sabha Election 2026 : राज्यसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू; 8 जूनपर्यंत अर्ज, मध्य प्रदेश-राजस्थानच्या जागांवर सर्वाधिक चर्चा