• Download App
    कोरोना मृत्यूदरात महाराष्ट्र चौथा; दर तासाला १४ लोकांचा बळी; पंजाब राज्य प्रथम क्रमांकावरMaharashtra fourth in corona mortality; 14 victims per hour; Punjab ranks first

    CoronaVirus Live Updates : कोरोना मृत्यूदरात महाराष्ट्र चौथा; दर तासाला १४ लोकांचा बळी; पंजाब राज्य प्रथम क्रमांकावर

    वृत्तसंस्था

    मुंबई : देशात जुलैमध्ये कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर असलेला महाराष्ट्र आता चौथ्या क्रमांकावर आहे. मृत्यूदरात पंजाब राज्य पहिल्या क्रमांकावर, उत्तराखंड दुसऱ्या आणि नागालँड तिसऱ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रातील मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. दर तासाला कोरोना १४ लोकांचा बळी घेत आहे. Maharashtra fourth in corona mortality; 14 victims per hour; Punjab ranks first

    जुलैमध्ये मृत्यूदर २.०२ टक्के होता, तो आता २.१२ टक्क्यांवर पोहोचला आहे. सप्टेंबरपासून हा मृत्यूदर स्थिर आहे. राज्यातील १९ फेब्रुवारी ते २२ ऑक्‍टोबर या कालावधीतील कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा आकडा काढला तर दर तासाला सरासरी १४ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे.

    सप्टेंबरपर्यंत राज्यात दर तासाला मृत्यूची संख्या १६ होती, ती ऑक्टोबरमध्ये ती थोडी कमी झाली असल्याने दिलासा मिळत आहे. मुंबईसह राज्यात कोरोनाची दुसरी लाट १० फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे.
    ९ मार्च २०२० रोजी सुरू झालेल्या साथीच्या आजाराने आतापर्यंत १,३९,९२५ लोकांचा बळी घेतला आहे. पहिल्या लाटेत ९ फेब्रुवारीपर्यंत ५१,३६० लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला, तर दुसऱ्या लाटेच्या सुरुवातीपासून म्हणजेच १० फेब्रुवारी ते २८ सप्टेंबरपर्यंत ८७,४५२लोकांचा मृत्यू झाला.


    Maharashtra Heavy Rain : मुंबईसह महाराष्ट्रभर मुसळधार पाऊस, चाळीसगाव परिसरात पाणीच पाणी, कन्नड घाटात दरड कोसळली


    तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या तीन महिन्यांत अनेक सण येणार आहेत. याच दरम्यान काही समारंभाचं देखील आयोजन करण्यात येईल. मात्र यामुळेच लोकांची मोठ्या संख्येने गर्दी होईल आणि हेच कोरोनाचा वेगाने प्रसार होण्यामागचं कारण ठरू शकतं.

    डेल्टा व्हेरियंटचा कहर वाढला

    सध्या कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचा कहर पाहायला मिळत आहे. लोकांनी अत्यंत सतर्क राहणं गरजेचं आहे. घरच्या घरीच सण साजरे करा. सणांच्या काळात लोकांचा हलगर्जीपणा चिंता वाढवू शकतो. त्यामुळचे कोरोना नियमांचं पालन करा असे आवाहन सरकारच्या वतीने करण्यात येत आहे.

    Maharashtra fourth in corona mortality; 14 victims per hour; Punjab ranks first

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    G7 च्या निमंत्रणावरून भारतात उगाच आरडाओरडा; कॅनडाचे भारताला निमंत्रण, पंतप्रधान मोदींचा होणार दौरा!!

    अजूनही “टाळी”, “पावले”, “फोन कॉल” पर्यंतच युतीची भाषा; पण ठाकरे बंधू अजूनही एकमेकांशी बोलेनात!!

    गवत खाऊन अणुबॉम्ब बनविण्याची भाषा करणाऱ्या आजोबाच्या नातवाची पाण्यावरून अणुबॉम्ब युद्धाची भाषा!!