• Download App
    विजय भवानीपूरमध्ये, डोळा दिल्लीवर; 2024 मध्ये केंद्रात ममतांचे सरकार; बंधू कार्तिक यांचा दावा । "There is no base of any other party other than TMC here. The party & Didi work for the people. We will form Govt in Delhi in 2024," says CM's brother Kartik

    विजय भवानीपूरमध्ये, डोळा दिल्लीवर ;२०२४ मध्ये केंद्रात ममतांचे सरकार; बंधू कार्तिक यांचा दावा

    वृत्तसंस्था

    कोलकत्ता : भवानीपूरमध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आघाडीवर आहेत. एकोणिसाव्या फेरीअखेर त्यांनी 54 हजार मतांची आघाडी घेतली आहे. कोलकत्यात ममता बॅनर्जी यांच्या समर्थकांनी हिरवा गुलाल उधळून विजयाचे जोरदार सेलिब्रेशन केले आहे. “There is no base of any other party other than TMC here. The party & Didi work for the people. We will form Govt in Delhi in 2024,” says CM’s brother Kartik

    यामध्ये ममता बॅनर्जी यांचे बंधू कार्तिक बॅनर्जी यांनी भर घातली आहे. आम्ही 2021 मध्ये भवानीपूर जिंकले. आता 2024 मध्ये दिल्ली जिंकू, असा दावा कार्तिक बॅनर्जी यांनी केला आहे. तृणमूल काँग्रेसच्या सेलिब्रेशनमध्ये ते सहभागी झाले आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचा पराभव झालेला असेल आणि केंद्रात ममता बॅनर्जी यांचे सरकार असेल, असा दावा कार्तिक यांनी केला आहे.



    ममता बॅनर्जी यांचा विजय भवानीपूरच्या पोटनिवडणुकीत होत आहे. पण त्यांचा डोळा आणि विजयाचा दावा दिल्लीवर आहे. पण भवानीपूरची पोटनिवडणुकीत यासाठी घ्यावी लागली की ममता बॅनर्जी पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुकीत नंदिग्राम मध्ये सुवेंदू अधिकारी यांच्या विरोधात हरल्या होत्या.

    भवानीपूरमध्ये तृणमूल काँग्रेसच्या वरिष्ठ आमदारांनी राजीनामा देऊन ती जागा मोकळी केली. त्यामुळे ममता बॅनर्जी पोटनिवडणूक घेऊन तेथे उभ्या राहू शकल्या. आता त्यांनी तेथे त्यांनी 54 हजार मतांची आघाडी घेतली आहे. त्याआधीच तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विजयाचा मार्ग दाखविला आहे. त्यामध्ये भर घालून कार्तिक बॅनर्जी यांनी 2024 मध्ये दिल्ली जिंकण्याचा दावा केला आहे.

    “There is no base of any other party other than TMC here. The party & Didi work for the people. We will form Govt in Delhi in 2024,” says CM’s brother Kartik

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    President Murmu : राष्ट्रपती मुर्मूंनी पाणबुडी INS वाघशीरमधून प्रवास केला, असे करणाऱ्या दुसऱ्या राष्ट्रपती

    Lucknow : लखनौमध्ये शियांचे अधिवेशन, मौलाना म्हणाले- वंदे मातरमच्या नावाखाली घाबरवले जातेय, पाकसारखी वागणूक मिळतेय

    Mohan Bhagwat : भागवत म्हणाले- संघाचे ध्येय हिंदू समाजाला एकत्र करणे, सनातन धर्म पुन्हा जिवंत करण्याची वेळ आली आहे