• Download App
    पंजाब - गोव्यात रस्त्यावर फिरून केजरीवालांचा प्रचार; दिल्लीतल्या घाण पाण्यावरून भाजपचा "आप"वर वार!!|Punjab - Kejriwal's campaign on the streets of Goa; BJP's attack on "Aap" from dirty water in Delhi

    पंजाब – गोव्यात रस्त्यावर फिरून केजरीवालांचा प्रचार; दिल्लीतल्या घाण पाण्यावरून भाजपचा “आप”वर वार!!

    प्रतिनिधी

    नवी दिल्ली : दिल्लीचा राज्यकारभार सोडून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पंजाब आणि गोव्यातल्या रस्त्यावर फिरून प्रचार करत आहेत. त्यावर भाजपने दिल्लीतल्या घाण पाण्याचा पुरवठ्यावरून आम आदमी पक्षाच्या सरकारवर वार केले आहेत.Punjab – Kejriwal’s campaign on the streets of Goa; BJP’s attack on “Aap” from dirty water in Delhi

    भाजपचे पंजाब प्रभारी आणि केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी दिल्लीतल्या घाण पाणीपुरवठा वरून केजरीवाल सरकारला टार्गेट केले आहे. अरविंद केजरीवाल आज गोव्यात आहेत. रस्त्यावरून पायी फिरून घरोघरी जाऊन त्यांनी आम आदमी पक्षाची प्रचार पत्रके वाटली.



    मोठ्या जाहीर सभांना बंदी असल्यामुळे चार कार्यकर्त्यांना घेऊन ते गोव्यात घरोघरी जात होते. या आधी पंजाबच्या दौऱ्यात काही ठिकाणी त्यांनी चालत जाऊन आम आदमी पार्टीचा प्रचार केला आहे.याच पार्श्वभूमीवर दिल्लीतल्या समस्यांच्या मुद्द्यावरून भाजपने अरविंद केजरीवाल यांचे वाभाडे काढले आहेत.

    “घर मे सुखा, दर पर गंदा पानी; “आप”के वादोंकी यही है कहानी!!”, अशा शब्दांमध्ये गजेंद्र सिंह शेखावत यांनी अरविंद केजरीवाल सरकारचे वाभाडे काढले आहेत. आपल्या ट्विटमधून त्यांनी दिल्लीतल्या सर्व प्रकारच्या दुरवस्थेचे फोटो शेअर केले आहेत.

    दिल्ली परिसरात तुमसे कुठे घर असेल तर आम आदमी पार्टीच्या सरकारकडून सुविधांची अपेक्षा सोडून द्या, असे खोचक वीट देखील गजेंद्र सिंह शेखावत यांनी केले आहेत. आता आम आदमी पार्टी गजेंद्र सिंग शेखावत यांच्या ट्विटर काय प्रत्युत्तर देते हे पाहणे रंजक ठरणार आहे.

    Punjab – Kejriwal’s campaign on the streets of Goa; BJP’s attack on “Aap” from dirty water in Delhi

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार