• Download App
    नरेंद्र मोदी यांच्याकडे पंतप्रधान म्हणून नव्हे तर समाजसुधारक म्हणून पाहण्याची गरज, संबित पात्रा यांचे प्रतिपादन|Narendra Modi needs to be seen as a social reformer, not only as a Prime Minister

    नरेंद्र मोदी यांच्याकडे पंतप्रधान म्हणून नव्हे तर समाजसुधारक म्हणून पाहण्याची गरज, संबित पात्रा यांचे प्रतिपादन

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांच्याकडे केवळ पंतप्रधान म्हणून नव्हे तर समाजसुधारक म्हणूनही पाहण्याची गरज आहे. गेली आठ वर्षे भारताच्या राजकारणात अतिशय महत्त्वाची आणि दिशा ठरवणारी वर्षे आहेत. पंतप्रधान मोदी यांनी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्यापासून प्रेरणा घेऊन सातत्याने असा योजना राबविल्या आहेत, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी केले आहे.Narendra Modi needs to be seen as a social reformer, not only as a Prime Minister

    पात्रा म्हणाले, मोदी हेही महात्मा फुलेंप्रमाणे अविरत काम करतात. मागील 8 वर्षे हिंदुस्तानच्या राजकारणातील अतिशय महत्वपूर्ण व दिशानिर्धारण करणारी वर्षे ठरली आहेत. पंतप्रधान मोदी यांनी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्यापासून प्रेरणा घेऊन सातत्याने असा योजना राबविल्या आहेत.



    ज्याद्वारे महिलांचे सशक्तीकरण होऊ शकेल व मागासवर्गीय लोक पुढे जावेत. महात्मा ज्योतिबा फुले जसे समाज सुधारक आहेत तसेच मोदीही समाज सुधारकांप्रमाणे दिवसभर परिश्रम करतात. मोदींना समाज सुधारक या रूपात पाहण्याचीही आवश्यकता आहे.

    पात्रा म्हणाले की, स्वच्छ भारत अभियानांतर्गत गेल्या आठ वर्षांत 11 कोटी शौचालये बांधण्यात आली आहेत. देशभरात 70 वर्षांत 60 टक्के शौचालये बांधली गेली, तर सात-आठ वर्षांत 21 टक्के काम पूर्ण झाले. उज्ज्वला योजना, बेटी बचाओ-बेटी पढाओ, पोषण अभियान, मुद्रा योजनेसह केंद्र सरकारच्या इतर महत्त्वाकांक्षी योजनांचा संदर्भ देत पात्रा म्हणाले की, यामुळे महिला आणि समाजाच्या शेवटच्या पायरीवर उभ्या असलेल्या लोकांचे सक्षमीकरण झाले आहे.

    Narendra Modi needs to be seen as a social reformer, not only as a Prime Minister

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Marco Rubio and S Jaishankar : अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांनी एस जयशंकर यांच्याशी केली चर्चा

    Asaduddin Owaisi : पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कीला असदुद्दीन ओवैसींनी सुनावले, म्हणाले..

    Operation Sindoor impact : भारत इथून पुढे दहशतवादाला act of war समजूनच ठोकणार, म्हणजे नेमके काय करणार??