• Download App
    केंद्रीय दलांच्या तुकड्यांवर अजूनही ममतांचा खार कायम, जवानांना परत बोलावण्याची मागणी। Mammata didi targets CRPF

    केंद्रीय दलांच्या तुकड्यांवर अजूनही ममतांचा खार कायम, जवानांना परत बोलावण्याची मागणी

    विशेष प्रतिनिधी

    कोलकता – मद्रास उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगावर ताशेरे ओढल्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तातडीने प्रतिक्रिया देत राज्यातील कोरोना संसर्गाला आळा घालता यावा म्हणून केंद्रीय दलांच्या तुकड्या काढून घ्याव्यात, अशी मागणी केली आहे. Mammata didi targets CRPF

    राज्यात संसर्ग पसरण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि निवडणूक आयोग जबाबदार असल्याचा आरोप करून ममता यांनी केला. त्या म्हणाल्या केंद्रीय दलाच्या जवानांच्या नियुक्तीला ममता यांनी सुरवातीपासूनच आक्षेप घेतला आहे.



    बंगालमध्ये केंद्रीय दलांचे सुमारे दोन लाख जवान नेमण्यात आले आहेत, ज्यांना कोरोनाग्रस्त राज्यांमधून आणण्यात आले आहे. हे जवान शाळा, महाविद्यालये, सुरक्षित घरे अशा ठिकाणी राहात आहेत. त्यामुळे कोरोना व्यवस्थापन कार्यवाहीवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. यातील ७५ टक्के जवानांना संसर्ग झालेला असू शकतो. त्यामुळे कृपा करून मतदानाच्या शेवटच्या आठव्या टप्प्यासाठी तरी त्यांना माघारी पाठविण्यात यावे.

    Mammata didi targets CRPF

    Related posts

    WhatsApp DP Scam : WhatsAppवर डीपी बदलून 7.8 कोटींची फसवणूक! माजी पंतप्रधानांच्या मुलालाही सायबर ठगांनी गंडवले; 4 कोटींची रक्कम गोठवली

    Rajya Sabha Election : राज्यसभा निवडणूक- झारखंडमध्ये क्रॉस व्होटिंग, काँग्रेस उमेदवाराचा पराभव, भाजप-समर्थित विजयी, 12 राज्यांमधील 26 जागांपैकी 19 जागा एनडीएला

    वाराणसीत राहुल गांधींच्या फोटोची परशुराम रुपात पूजा; एका हातात परशु, दुसऱ्या हातात घटना!!