• Download App
    केंद्रीय दलांच्या तुकड्यांवर अजूनही ममतांचा खार कायम, जवानांना परत बोलावण्याची मागणी। Mammata didi targets CRPF

    केंद्रीय दलांच्या तुकड्यांवर अजूनही ममतांचा खार कायम, जवानांना परत बोलावण्याची मागणी

    विशेष प्रतिनिधी

    कोलकता – मद्रास उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगावर ताशेरे ओढल्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तातडीने प्रतिक्रिया देत राज्यातील कोरोना संसर्गाला आळा घालता यावा म्हणून केंद्रीय दलांच्या तुकड्या काढून घ्याव्यात, अशी मागणी केली आहे. Mammata didi targets CRPF

    राज्यात संसर्ग पसरण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि निवडणूक आयोग जबाबदार असल्याचा आरोप करून ममता यांनी केला. त्या म्हणाल्या केंद्रीय दलाच्या जवानांच्या नियुक्तीला ममता यांनी सुरवातीपासूनच आक्षेप घेतला आहे.



    बंगालमध्ये केंद्रीय दलांचे सुमारे दोन लाख जवान नेमण्यात आले आहेत, ज्यांना कोरोनाग्रस्त राज्यांमधून आणण्यात आले आहे. हे जवान शाळा, महाविद्यालये, सुरक्षित घरे अशा ठिकाणी राहात आहेत. त्यामुळे कोरोना व्यवस्थापन कार्यवाहीवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. यातील ७५ टक्के जवानांना संसर्ग झालेला असू शकतो. त्यामुळे कृपा करून मतदानाच्या शेवटच्या आठव्या टप्प्यासाठी तरी त्यांना माघारी पाठविण्यात यावे.

    Mammata didi targets CRPF

    Related posts

    West Bengal : बंगालमध्ये OBC आरक्षण 17% वरून 7%; ममता सरकारची OBC-A आणि OBC-B व्यवस्था रद्द

    One Nation, One Election : वन नेशन, वन इलेक्शन- JPC ची टीम गुजरातमध्ये; प्रियंका गांधी यांच्यासह 39 सदस्य सर्व पक्षांच्या नेत्यांची भेट घेणार

    CJI Surya Kant : CJI सूर्यकांत म्हणाले- शांततापूर्ण विरोधाचा अधिकार; पण रस्ता अडवून लोकांना त्रास देऊ शकत नाही