• Download App
    योगी आदित्यनाथांचे सरकार येण्यापूर्वी पश्चिम यूपीमध्ये लोक रस्त्यावर बंदुकीचे कट्टे ओवाळायचे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टीका|Before Yogi Adityanath's government came, people in western UP used to wave guns on the streets, criticizes Prime Minister Narendra Modi

    योगी आदित्यनाथांचे सरकार येण्यापूर्वी पश्चिम यूपीमध्ये लोक रस्त्यावर बंदुकीचे कट्टे ओवाळायचे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टीका

    विशेष प्रतिनिधी

    लखनऊ : योगी आदित्यनाथ यांचे सरकार स्थापन होण्यापूर्वी पश्चिम उत्तर प्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती अत्यंत बिकट होती. पश्चिम यूपीमध्ये सूर्यास्त होताच लोक रस्त्यावर बंदुकीचे कट्टे ओवाळताना दिसत होते. मात्र, योगींनी राज्यात कायदा आणि सुव्यवस्था आणली असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.Before Yogi Adityanath’s government came, people in western UP used to wave guns on the streets, criticizes Prime Minister Narendra Modi

    मोदी म्हणाले की, पूर्वी मुलींच्या सुरक्षेवर दररोज प्रश्न निर्माण होत होते, त्यांना महाविद्यालयात जाणेही कठीण होते. दंगल आणि जाळपोळ केव्हा आणि कुठे होईल हे कोणीही सांगू शकत नव्हते. मात्र गेल्या साडेचार वर्षांत योगी सरकारने परिस्थिती सुधारण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे.



    आज उत्तर प्रदेशातील परिस्थिती मोठ्या प्रमाणात सुधारली आहे. एवढ्या मोठ्या यूपीला चालवण्यासाठी जी ताकद आणि शक्ती आवश्यक आहे. ते हे डबल इंजिन सरकार पूर्ण करत आहे. एवढ्या मोठ्या उत्तर प्रदेशाला चालवण्यासाठी जी ताकद लागते, त्यासाठी हे डबल इंजिन सरकार मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहेत. गंगा एक्स्प्रेस-वे हा यूपीच्या प्रगतीची दारे उघडेल.

    आपल्याकडे येथे काही राजकीय पक्ष आहेत, जे देशाच्या विकासात अडचणी आणण्याचे प्रयत्न करत आहेत. त्यांना त्यांच्या व्होटबँकेची जास्त काळजी वाटते,अशी टीका करून मोदी म्हणाले, त्यांना काशीचा विकास होऊ द्यायचा नाही. त्यांना गंगा स्वच्छ करू द्यायची नाही.

    यापूवीर्ही मुलींच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. उत्तर प्रदेशात योगी सरकारने गरिबांसाठी पक्के घरे बांधण्यासाठी 2 लाख कोटी रुपये मंजूर केले आहेत. हे सरकार गरिबांचे सरकार आहे. 21 व्या शतकात हाय-स्पीड कनेक्टिव्हिटी आवश्यक आहे.

    यामुळे या एक्स्प्रेस-वेला विमानतळ जोडले जाईल मेट्रो देखील जोडली जाईल. आम्ही यूपीमध्ये सबका साथ, सबका विकासासाठी मनापासून काम करत आहोत. आमचे सरकार गरिबांसाठी रात्रंदिवस काम करत आहे. सरकारने 30 लाख गरिबांना घरकूल दिली आहेत.

    Before Yogi Adityanath’s government came, people in western UP used to wave guns on the streets, criticizes Prime Minister Narendra Modi

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    India-US : द फोकस एक्सप्लेनर : भारत-अमेरिका व्यापारी फ्रेमवर्क: “Zero Tariff” म्हणजे काय आणि त्याचा सर्वसामान्यांवर काय अर्थ?

    Malegaon : मालेगावमध्ये इस्लाम पक्षाच्या नसरीन महापौर झाल्या, सपा उपमहापौरपदी

    Tragedy in Kota : कोटामध्ये 3 मजली इमारत कोसळली, अनेक जण दबले; रेस्टॉरंटमध्ये ग्राहक आणि कर्मचारी होते