• Download App
    नवरात्रीनिमित्त महाराष्ट्रात महिला आरोग्य विशेष अभियान; ग्रामीण भागात विशेष भरWomen's health special campaign in Maharashtra on the occasion of Navratri

    नवरात्रीनिमित्त महाराष्ट्रात महिला आरोग्य विशेष अभियान; ग्रामीण भागात विशेष भर

    प्रतिनिधी

    मुंबई : नवरात्रोत्सवानिमित्त शिंदे फडणवीस सरकारने महिलांसाठी एक खास अभियान जाहीर केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात एक घोषणा केली आहे. Women’s health special campaign in Maharashtra on the occasion of Navratri

    सोमवारपासून सुरु झालेल्या शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने राज्याच्या आरोग्य विभागामार्फत ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ हे विशेष अभियान आयोजित केले आहे. 26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर दरम्यान, चालणा-या या अभियानात घरातील माता निरोगी राहावी, जागरुक राहावी आणि समाजात तिच्या आरोग्याबद्दल संवेदनशीलता निर्माण व्हावी, असा आमचा उद्देश आहे. यानिमित्ताने राज्यातील सर्व माता, भगिनींनी आपल्या आरोग्याची आवश्यक तपासणी करुन घ्यावी, अशी विनंती आपल्याला करत आहे, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.


    FADNAVIS VS MALIK: नवाब मलिकांचा ‘हायड्रोजन बॉम्ब’ -फडणविसांचे ‘ट्विटास्त्र’ ; म्हणे डुकराशी कुस्ती खेळायची नसते …


    महिलांनी लाभ घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन 

    सार्वजनिक आरोग्य विभागाकडून राज्यभरात माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान राबवले जाणार आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात सकाळी 9 ते 2 या वेळेत 18 वर्षांवरील महिला, माता यांच्या सर्वांगीण तपासण्या केल्या जाणार आहेत. रक्त तपासण्या, जननी सुरक्षा योजना, प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांचे नवीन बॅंक खाते उघडणे, गरोदर मातांचे आधार कार्ड जोडणे यांचा समावेश असल्याची माहितीही आरोग्य विभागाने दिली आहे.

    Women’s health special campaign in Maharashtra on the occasion of Navratri

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Anil Ambani : अनिल अंबानींवर ₹1.5 लाख कोटींच्या घोटाळ्याचा आरोप; सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली; CBI-ED कडून 10 दिवसांत सीलबंद अहवाल मागवला

    Kathua Encounter : जम्मू-काश्मीरच्या कठुआमध्ये जैशचा दहशतवादी ठार; अमेरिका मेड M4 रायफल जप्त

    Mamata Banerjee : ममता म्हणाल्या-SIR च्या चिंतेत बंगालमध्ये रोज 4 आत्महत्या; 110 हून अधिक लोकांचा मृत्यू; निवडणूक आयोग आणि केंद्र सरकार जबाबदार