• Download App
    नवरात्रीनिमित्त महाराष्ट्रात महिला आरोग्य विशेष अभियान; ग्रामीण भागात विशेष भरWomen's health special campaign in Maharashtra on the occasion of Navratri

    नवरात्रीनिमित्त महाराष्ट्रात महिला आरोग्य विशेष अभियान; ग्रामीण भागात विशेष भर

    प्रतिनिधी

    मुंबई : नवरात्रोत्सवानिमित्त शिंदे फडणवीस सरकारने महिलांसाठी एक खास अभियान जाहीर केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात एक घोषणा केली आहे. Women’s health special campaign in Maharashtra on the occasion of Navratri

    सोमवारपासून सुरु झालेल्या शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने राज्याच्या आरोग्य विभागामार्फत ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ हे विशेष अभियान आयोजित केले आहे. 26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर दरम्यान, चालणा-या या अभियानात घरातील माता निरोगी राहावी, जागरुक राहावी आणि समाजात तिच्या आरोग्याबद्दल संवेदनशीलता निर्माण व्हावी, असा आमचा उद्देश आहे. यानिमित्ताने राज्यातील सर्व माता, भगिनींनी आपल्या आरोग्याची आवश्यक तपासणी करुन घ्यावी, अशी विनंती आपल्याला करत आहे, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.


    FADNAVIS VS MALIK: नवाब मलिकांचा ‘हायड्रोजन बॉम्ब’ -फडणविसांचे ‘ट्विटास्त्र’ ; म्हणे डुकराशी कुस्ती खेळायची नसते …


    महिलांनी लाभ घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन 

    सार्वजनिक आरोग्य विभागाकडून राज्यभरात माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान राबवले जाणार आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात सकाळी 9 ते 2 या वेळेत 18 वर्षांवरील महिला, माता यांच्या सर्वांगीण तपासण्या केल्या जाणार आहेत. रक्त तपासण्या, जननी सुरक्षा योजना, प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांचे नवीन बॅंक खाते उघडणे, गरोदर मातांचे आधार कार्ड जोडणे यांचा समावेश असल्याची माहितीही आरोग्य विभागाने दिली आहे.

    Women’s health special campaign in Maharashtra on the occasion of Navratri

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Malappuram : केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडूत एनआयएचे १९ ठिकाणी छापे; मलप्पुरम स्फोटकसाठा प्रकरणात मोठी कारवाई

    Jacqueliene Fernandez : जॅकलिन फर्नांडिस आणि सुकेश चंद्रशेखर यांना मोठा धक्का; २०० कोटींच्या मनी लॉन्डरिंग प्रकरणात आरोप निश्चित करण्याचे न्यायालयाचे आदेश

    Supreme Court : वन्यजीव जंगलातच सुरक्षित; सुरक्षित वातावरणातून प्राण्यांना हटवणे म्हणजे क्रूरता, सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वाची टिप्पणी