Farm laws : शेतकरी आंदोलन संपवून आपापल्या घरी निघून गेल्यानंतर आता काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी शेतकरीविरोधी षडयंत्र रचला जात असल्याची भीती व्यक्त केली आहे. कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या एका वक्तव्यावर प्रत्युत्तर देत त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. एका ट्विटद्वारे आरोप करत त्यांनी शेतकरीविरोधी षडयंत्र उघड झाल्याचं म्हटलं आहे. Will Farm laws come back? Congress Criiticizes Union Agriculture Minister Tomars reply, read in detail
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : शेतकरी आंदोलन संपवून आपापल्या घरी निघून गेल्यानंतर आता काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी शेतकरीविरोधी षडयंत्र रचला जात असल्याची भीती व्यक्त केली आहे. कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या एका वक्तव्यावर प्रत्युत्तर देत त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. एका ट्विटद्वारे आरोप करत त्यांनी शेतकरीविरोधी षडयंत्र उघड झाल्याचं म्हटलं आहे. निवडणुकीनंतर पुन्हा शेतकऱ्यांवर वार होणार असल्याचा दावाही त्यांनी केलाय.
वास्तविक, केंद्रीय कृषिमंत्री तोमर यांना कृषी कायदे परत येणार का? असा सवाल करण्यात आला होता. त्यावर ते म्हणाले होते की, आम्ही एक पाऊल मागे हटलो आहोत, पुन्हा पुढे जाऊ.” त्यांच्या याच वक्तव्यावरून सुरजेवालांनी टीका केली आहे.
सुरजेवाला म्हणाले की, मोदीजी 3 काळ्या कृषी कायद्यांसाठी माफी मागतात, देशाचे कृषी मंत्री पुन्हा एकदा त्या कायद्यांचे समर्थन करतात. मोदी सरकारने 3 काळे कायदे रद्द केले, कृषिमंत्री म्हणतात पुन्हा कायदा आणू म्हणतात. सुरजेवाला यांनी नरेंद्र सिंह तोमर यांच्या वक्तव्याचा व्हिडिओही ट्विट केला आहे.
आम्ही कृषी सुधारणा विधेयक आणले होते, असे केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी शुक्रवारी नागपुरात सांगितले होते. काही लोकांना हे आवडले नाही, पण स्वातंत्र्याच्या 70 वर्षांनंतर ही एक मोठी सुधारणा होती. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ही सुधारणा प्रगतिपथावर असल्याचे ते म्हणाले. तोमर म्हणाले होते की, सरकार निराश नाही, आम्ही एक पाऊल मागे घेतले आहे, आम्ही पुढे जाऊ, कारण भारताचा शेतकरी हा भारताचा कणा आहे. पाठीचा कणा मजबूत असेल तर नक्कीच देश मजबूत होईल.”
Will Farm laws come back? Congress Criiticizes Union Agriculture Minister Tomars reply, read in detail
महत्त्वाच्या बातम्या
- Punjab Election : माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगला अनेक पक्षांकडून ऑफर, म्हणाला- सिद्धूंची भेट खेळाडू म्हणून घेतली, राजकारणाचा अजून विचार नाही
- मोठी बातमी : पंजाबमध्ये शेतकऱ्यांकडून निवडणूक लढवण्याची घोषणा, 22 संघटनांनी मिळून बनवला पक्ष, जाणून घ्या कोण असेल आघाडीचा चेहरा
- छापेमारी : पावणे दोनशे कोटीवाल्या पीयूष जैननंतर आता अत्तर व्यापारी राणू मिश्रावरही प्राप्तिकरच्या धाडी, दक्षता पथकाकडून तपास सुरू
- कोट्यावधी जनतेशी जोडणारी भाजपशी देणगी संपर्क मोहीम सुरू; अटल जयंती ते दीनदयाळ पुण्यतिथी पर्यंत उपक्रम!!
- कोव्हक्सीन लसनिर्मिती भारतात झाल्याने अनेकांना पोटशूळ, तक्रारीचा पाढा वाचला; सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांची जोरदार टीका