• Download App
    भारतात केव्हा लागू होणार समान नागरी संहिता? केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनी स्पष्टच सांगितले|When will Uniform Civil Code be implemented in India? Union Law Minister Kiren Rijiju made it clear

    भारतात केव्हा लागू होणार समान नागरी संहिता? केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनी स्पष्टच सांगितले

    प्रतिनिधी

    नवी दिल्ली : केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनी शनिवारी सांगितले की, केंद्र सरकार लवकरच समान नागरी संहिता (यूसीसी) लागू करण्याचा विचार करत आहे. भारतीय जनता पक्षाचे (भाजप) नेते रिजिजू म्हणाले, “भारतीय राज्यघटनेच्या कलम 44 मध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे की समान नागरी संहिता लागू करण्यासाठी राज्याने प्रयत्न केले पाहिजेत. आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक पाऊल उचलतो जे यासाठी आवश्यक आहे.”When will Uniform Civil Code be implemented in India? Union Law Minister Kiren Rijiju made it clear

    आज तकला दिलेल्या मुलाखतीत रिजिजू म्हणाले, “सध्या मी ते जाहीर करू शकत नाही, परंतु आपल्या सरकारचा आणि या देशातील लोकांची इच्छा काय आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे. यासाठी जे काही करावे लागेल ते योग्य वेळी होईल.” समान नागरी संहिता कधी लागू होणार? हा प्रश्न टाळत किरेन रिजिजू म्हणाले की, लोकांना भाजप आणि आमच्या सरकारचा अजेंडा माहीत आहे.



    कॉलेजियम हा माइंड गेम, त्याबद्दल बोलणार नाही: रिजिजू

    त्याच वेळी, केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनी कॉलेजियमच्या मुद्द्याला माइंड गेम म्हणून संबोधले आणि शनिवारी सांगितले की मी याबद्दल बोलणार नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमच्या अनेक शिफारशी सरकारसमोर प्रलंबित असल्याबद्दल विचारले असता त्यांनी हे वक्तव्य केले. यामध्ये उच्च न्यायालयांच्या मुख्य न्यायाधीशांच्या नियुक्तीच्या शिफारशींचाही समावेश आहे.

    रिजिजू म्हणाले की, कॉलेजियमचा मुद्दा हा संपूर्ण माइंडगेम आहे. मी याबद्दल बोलणार नाही. अरुणाचल प्रदेशमध्ये 4G सेवेसाठी 254 मोबाईल टॉवर्स समर्पित करण्याच्या कार्यक्रमासंदर्भात ते बोलत होते. ते म्हणाले की, सीमावर्ती भागात पायाभूत सुविधांचा अभाव हा स्थानिक लोकांसाठी मोठा प्रश्न आहे.

    When will Uniform Civil Code be implemented in India? Union Law Minister Kiren Rijiju made it clear

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Mumbai Police : मुंबई पोलिसांची गुजरातमध्ये धडक कारवाई; ७४ कोटींचा अमली पदार्थ कारखाना उद्ध्वस्त, राज्याच्या सीमापार जाऊन माफियांना मोठा दणका

    Mamata Banerjee : ममता बॅनर्जींविरोधात बंडाची कुजबुज? ८० पैकी ५० आमदारांच्या गुप्त बैठकीचा दावा; ‘तृणमूल आता ममतांचा पक्ष राहिलेला नाही’

    ED :दाऊदच्या हस्तकाविरुद्ध ईडीची मोठी कारवाई; महाराष्ट्र-गुजरातमध्ये २० ठिकाणी छापे, अमली पदार्थांच्या साम्राज्याचा शोध