वृत्तसंस्था
कुचबिहार – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज कुचबिहारच्या सीतालकुचीत सांत्वन दौरा काढला. त्या तेथे हिंसाचारात मरण पावलेल्या चार व्यक्तींच्या नातेवाईकांना भेटल्या आणि निवडणूक संपल्यावर मदतीचे आश्वासन दिले. West Bengal CM Mamata Banerjee met the families of those killed in the Sitalkuchi, Cooch Behar violence
ममता दीदी आम्हाला येऊन भेटल्या. त्यांनी निवडणूक संपल्यावर मदतीचे आश्वासन दिले आहे. आमचा त्यांच्यावर विश्वास आहे, असे मरण पावलेल्यांच्या नातेवाईकांनी एएनआय वृत्तसंस्थेला सांगितले.
ममता बॅनर्जी यांनी मतदारांना केंद्रीय दलांचा घेराव करा, असे आवाहन केले होते. त्यानंतर सीतालकुचीत मतदानाच्या वेळी जमावाने सीएपीएफ जवानाला घेरून त्याची रायफल खेचण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी झालेल्या हिंसाचारात चार जण ठार झाले होते.
या मुद्द्यावरून पश्चिम बंगालमध्ये हिंसाचाराचे राजकारण पेटले. सीतालकुचीत जाऊन आपण त्या परिवारांचे सांत्वन करू, असे ममतांनी आधीच जाहीर केले होते. त्यानुसार आज त्या तेथे गेल्या होत्या. मात्र, त्याच दिवशी भाजपच्या एका कार्यकर्त्याची तृणमूळच्या गुंडांनी हत्या केली. त्याच्याविषयी ममतांनी अश्रू ढाळले नाहीत, असे टीकास्त्र केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोडले होते.
विशेष बातम्या
- मुख्यमंत्र्यांकडून अखेर महाराष्ट्रात १५ दिवसांच्या १४४ कलम संचारबंदीची घोषणा, एकूण ५४०० कोटी रूपयांचे पॅकेजही जाहीर
- शाळा, कॉलेज, मंदिरे, मॉल, क्लासेस, जिम, सलून्स, ब्यूटी पार्लस, थिएटर, बागा, शूटिंग सगळे बंद; इ कॉमर्स सेवा सुरू; अन्नाच्या पार्सल सेवा सुरू
- महाराष्ट्रात ५४०० कोटींचे पॅकेज; नैसर्गिक आपत्तीचे निकष लावून लोकांना वैयक्तिक स्वरूपाची मदत देण्याची मुख्यमंत्र्याची पंतप्रधानांकडे मागणी
- वीजबिल, मालमत्ता कर, जीएसटी सवलती ठाकरे – पवार सरकारने जाहीर केल्या नाहीत ; – विरोधी पक्ष नेते श्री देवेंद्र फडणवीस यांची टीका
- अक्षयकुमार आणि सचिनने हॉस्पिटल बेड अडवून ठेवण्याची गरज नव्हती, त्यांनी घरीच उपचार घ्यायला हवे होते; अस्लम शेख यांची शेरेबाजी