• Download App
    सर्वोच्च न्यायालयाकडून अरविंद केजरीवाल यांना तूर्तास दिलासा नाही!|There is no relief for Arvind Kejriwal from the Supreme Court

    सर्वोच्च न्यायालयाकडून अरविंद केजरीवाल यांना तूर्तास दिलासा नाही!

    पुढील सुनावणी २९ एप्रिल रोजी असणार


    विशेष प्रतिनिधी

    ईडीच्या अटकेविरोधात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाकडून तूर्तास दिलासा मिळालेला नाही. तसेच, अबकारी घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अटकेविरोधात अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने ईडीला २४ एप्रिलपर्यंत उत्तर दाखल करण्यास सांगितले आहे. आता याप्रकरणी पुढील सुनावणी २९ एप्रिलला होणार आहे.There is no relief for Arvind Kejriwal from the Supreme Court



    अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवर निर्णय देताना दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांना दिलासा दिला नाही आणि तपास यंत्रणा ईडीने केलेली त्यांची अटक योग्य असल्याचे सांगितले. दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

    केजरीवाल यां ना अंमलबजावणी संचालनालयाने 21 मार्च रोजी अटक केली होती आणि ते 15 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत आहेत. केजरीवाल सध्या दिल्लीच्या तिहार तुरुंगात आहेत आणि येथून ते दिल्लीचे सरकार चालवत आहेत.

    There is no relief for Arvind Kejriwal from the Supreme Court

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    West Bengal : बंगालमध्ये OBC आरक्षण 17% वरून 7%; ममता सरकारची OBC-A आणि OBC-B व्यवस्था रद्द

    One Nation, One Election : वन नेशन, वन इलेक्शन- JPC ची टीम गुजरातमध्ये; प्रियंका गांधी यांच्यासह 39 सदस्य सर्व पक्षांच्या नेत्यांची भेट घेणार

    CJI Surya Kant : CJI सूर्यकांत म्हणाले- शांततापूर्ण विरोधाचा अधिकार; पण रस्ता अडवून लोकांना त्रास देऊ शकत नाही