• Download App
    सर्वोच्च न्यायालयाकडून अरविंद केजरीवाल यांना तूर्तास दिलासा नाही!|There is no relief for Arvind Kejriwal from the Supreme Court

    सर्वोच्च न्यायालयाकडून अरविंद केजरीवाल यांना तूर्तास दिलासा नाही!

    पुढील सुनावणी २९ एप्रिल रोजी असणार


    विशेष प्रतिनिधी

    ईडीच्या अटकेविरोधात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाकडून तूर्तास दिलासा मिळालेला नाही. तसेच, अबकारी घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अटकेविरोधात अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने ईडीला २४ एप्रिलपर्यंत उत्तर दाखल करण्यास सांगितले आहे. आता याप्रकरणी पुढील सुनावणी २९ एप्रिलला होणार आहे.There is no relief for Arvind Kejriwal from the Supreme Court



    अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवर निर्णय देताना दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांना दिलासा दिला नाही आणि तपास यंत्रणा ईडीने केलेली त्यांची अटक योग्य असल्याचे सांगितले. दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

    केजरीवाल यां ना अंमलबजावणी संचालनालयाने 21 मार्च रोजी अटक केली होती आणि ते 15 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत आहेत. केजरीवाल सध्या दिल्लीच्या तिहार तुरुंगात आहेत आणि येथून ते दिल्लीचे सरकार चालवत आहेत.

    There is no relief for Arvind Kejriwal from the Supreme Court

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार