विशेष प्रतिनिधी
नाशिक : गोविंददेव गिरी महाराज यांच्या मुखातून तथागत कथा ऐकायची नाशिककरांना तीन दिवसांची संधी मिळणार असून येत्या १ मे ते ३ मे २०२६ असा तीन दिवसांचा कार्यक्रम वसंत व्याख्यानमाला आणि रामतीर्थ गोदावरी सेवा समितीने आयोजित केला आहे.
आजच्या अत्यंत तणावपूर्ण वातावरणात भगवान बुद्धांचे जीवन आणि त्यांनी दिलेला शांतीचा संदेश अत्यंत महत्त्वाचा आहे. तथागतांनी मानवाला मध्यम मार्ग दाखविला. शांती, अहिंसा करुणा आणि समतेचा संदेश दिला.
भगवान बुद्धांची कथा केवळ ऐतिहासिक स्वरूपाचे वर्णन नसून त्याद्वारे मानवी मनाचा शोध घेऊन मूल्याधिष्ठित जीवनाकडे नेणारी दिशा दाखविणारी आहे. गोविंददेव गिरी महाराजांच्या रसाळ वाणीतून आणि त्यांच्या प्रगल्भ विवेचनातून श्रोत्यांना आत्मपरिवर्तनाची प्रेरणा मिळेल.
१ मे ते ३ मे अशा तीन दिवसांमध्ये गोदावरी घाटावर यशवंत महाराज पटांगणात सायंकाळी ६.०० ते ८.०० ही तथागत कथा होईल. संस्कार संस्कृती आणि पर्यावरणाचा त्रिवेणी संगम असणाऱ्या या सोहळ्यात नाशिककरांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जयंत गायधनी, राजेंद्र गायकवाड आणि संजय साळवे यांनी केले आहे.
‘Tathagata Katha’ directly from the lips of Govinddev Giri Maharaj!
महत्वाच्या बातम्या
- PM Netanyahu : इस्रायली पंतप्रधानांना प्रोस्टेट कॅन्सर झाला, गुपचूप उपचार केले; 2 महिने माहिती लपवली
- फडणवीस – ठाकरे भेटीची सोडली पुडी; पण संशय पेरणी दोघांपैकी कुणाविषयी??
- आप फुटली, काँग्रेस हसली, ठाकरे सेना रुसली!!
- Raghav Chadha : ‘आप’चे राज्यसभा खासदार राघव चड्ढा भाजपत; म्हणाले- 10 पैकी 7 खासदार सोबत