• Download App
    Dattatreya Hosabale राम मंदिरातील देणगी चोरी प्रकरणात संघाची भूमिका कठोर; पण हिंदू विरोधी षडयंत्राकडेही बोट!!

    राम मंदिरातील देणगी चोरी प्रकरणात संघाची भूमिका कठोर; पण हिंदू विरोधी षडयंत्राकडेही बोट!!

    विशेष प्रतिनिधी

    नाशिक : अयोध्येतल्या श्रीराम मंदिरात देणगीची चोरी झाली. या विषयावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आज अधिकृतपणे कठोर भूमिका जाहीर केली. संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी एक निवेदन जारी करून राम मंदिरातील देणगी चोरांना कठोर शासन झाले पाहिजे, पण त्याचवेळी राम मंदिरातल्या चोरीचे निमित्त करून हिंदू विरोधी आणि देशविरोधी तत्त्वांनी हिंदू धर्माच्या आणि हिंदू समाजाच्या बदनामीचे केलेले षडयंत्र उधळून लावले पाहिजे, असे स्पष्ट केले.

    अयोध्यातले श्रीराम जन्मभूमी मंदिर हे संपूर्ण हिंदू समाजाचे आस्था असलेले स्थान आहे. तिथे झालेली देणगीची चोरी अत्यंत दुर्दैवी आहे. त्या संदर्भात सरकारने कठोर कायदेशीर कारवाई करून दोषींना कठोरातील कठोर सजा द्यावी असेच संघाचे मत असल्याचे दत्तात्रय होसबळे यांनी स्पष्ट केले. हिंदू समाजाने धैर्य राखावे.

    राम मंदिरातील चोरीचे निमित्त‌ करून हिंदू विरोधी आणि देशविरोधी तत्वे हिंदू समाजाला आणि हिंदू धर्माला बदनाम करायचा प्रयत्न करत आहेत, तो त्यांचा डाव हिंदू समाजाने हाणून पाडावा, असे आवाहनही दत्तात्रय होसबळे यांनी केले. त्याचबरोबर त्यांनी राम मंदिरातील सर्व व्यवस्था सुरळीत करण्यात येतील, अशी ग्वाही सुद्धा दिली.

    – “त्या” तिघांची नावे नाही घेतली

    मात्र या निवेदनात दत्तात्रय होसबळे यांनी चंपत राय, अनिल मिश्रा आणि गोपाल राव यांची नावे घेतली नाहीत. राम मंदिरातील चोरी प्रकरणात आढळलेल्या सर्व दोषींना कठोर कायदेशीर शिक्षा करावी, अशी संघाची भूमिका त्यांनी जाहीर केली.

    Statement issued by Dattatreya Hosabale about Ram Mandir

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Hardeep Puri : पेट्रोल-डिझेलच्या किमतींवर निर्णय 2-3 महिन्यांत; सरकारने म्हटले- इराण युद्धात खरेदी केलेले महागडे कच्चे तेल प्रक्रिया केले जात आहे, कंपन्यांना ₹74,781 कोटींचा तोटा

    दिल्लीत चार दहशतवाद्यांच्या अटकेपाठोपाठ गुजरात मध्ये आठ दहशतवाद्यांना अटक; जैश ए मोहम्मद संघटनेसाठी होते कार्यरत!!

    Election Commission : ममतांपासून वेगळा झालेला बंडखोर गट म्हणाला- आम्हीच खरे TMC:निवडणूक आयोगाची भेट घेतली, लवकर निर्णय घ्या सांगितले