• Download App
    पश्चिम बंगालमध्ये बेकायदेशीर फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट, आठ जणांचा मृत्यू! Several people feared dead in an explosion at the Illegal crackers factory in Duttapukur West Bengal

    पश्चिम बंगालमध्ये बेकायदेशीर फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट, आठ जणांचा मृत्यू!

    (संग्रहित छायाचित्र)

    मृतांचा आकडा वाढण्याची भीती;  स्फोट इतका भीषण होता की परिसरातील अनेक घरांचेही नुकसान झाले.

    विशेष प्रतिनिधी

    कोलकाता : पश्चिम बंगालमधील उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील दत्तपुकुर भागात रविवारी सकाळी बेकायदेशीर फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मात्र मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. स्फोट इतका भीषण होता की परिसरातील अनेक घरांचेही नुकसान झाले. Several people feared dead in an explosion at the Illegal crackers factory in Duttapukur West Bengal

    या स्फोटाच्या घटनेनंतर भाजपाने ममता सरकारवर  हल्ला चढवला आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष सुकांत मजुमदार म्हणाले की, ममता बॅनर्जी संपूर्ण राज्याला स्मशानभूमी बनवूनच स्वस्थ बसरणार आहेत का? स्थानिक लोकांनी सांगितले की, माजपूर जगन्नाथपूरजवळील एका कारखान्यात झालेला स्फोट इतका भीषण होता की अनेक घरांचे पत्रे उडाले आणि किमान १० लोक जखमी झाले, मृतदेह जागीच विखुरले गेले.

    या स्फोटातील जखमींना बारासात रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडल्याचे सांगितले गेले  आहे. गजबजलेल्या भागात फटाक्याचा कारखाना कसा चालू होता. याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. विशेष म्हणजे की, याआधी पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील एग्रा येथे एका बेकायदेशीर फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट झाला होता. यामध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.

    पोलिसांनी सांगितले की, कोलकात्याच्या उत्तरेला सुमारे ३० किमी अंतरावर असलेल्या दत्तपुकुर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नीलगंजमधील मोशपोल येथील कारखान्यात अनेक लोक काम करत होते. त्यावेळी अचानक कारखान्यात स्फोट झाला.

    Several people feared dead in an explosion at the Illegal crackers factory in Duttapukur West Bengal

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    China : चीन म्हणाला- आम्ही पाकिस्तानसोबत; PAKचा दावा- सैन्याने पेशावरमध्ये भारतीय ड्रोन पाडला

    भारताने आधी हल्ला केला, भारताला त्याची किंमत चुकवावी लागेल, पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचा खोटा दावा

    ceasefire पाकिस्तानने युद्धबंदीचे उल्लंघन केल्याची परराष्ट्र मंत्रालयानेही केली पुष्टी