• Download App
    '...आणखी किती बिहारी मरण्याची वाट पाहताय मुख्यमंत्री' नितीश कुमार सरकारवर चिराग पासवान यांचे टीकास्त्र! Chirag Paswans criticism of Nitish Kumar government

    ‘…आणखी किती बिहारी मरण्याची वाट पाहताय मुख्यमंत्री’ नितीश कुमार सरकारवर चिराग पासवान यांचे टीकास्त्र!

    मुख्यमंत्री खुर्ची वाचवण्यात व्यस्त आहेत, असंही चिराग यांनी म्हटलं आहे.

    विशेष प्रतिनिधी

    पाटणा : बिहारमध्ये गुन्हेगारी घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या घटना  समोर येत आहेत. अशा परिस्थितीत विरोधी पक्ष नितीश सरकारवर प्रश्न उपस्थित करत आहेत. Chirag Paswans criticism of Nitish Kumar government

    यापूर्वी पाटण्यात भाजपा नेते नीलेश मुखिया यांची गुन्हेगारांनी हत्या केली होती. दुसरीकडे, 26 ऑगस्ट रोजी लोजप (रामविलास) प्रमुख चिराग पासवान दिवंगत नीलेश मुखिया यांच्या घरी पोहोचले आणि त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. बिहारमधील वाढत्या गुन्हेगारी घटनांवरून चिराग पासवान यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री आणखी किती बिहारी मारण्याची वाट पाहतील, असा सवाल त्यांनी केला.

    चिराग पासवान म्हणाले की, बिहारमध्ये राजकीय राजाश्रय असल्याने जंगलराज आहे. राजकीय पक्षाशी संबंधित व्यक्तीवर कारवाई का होत नाही? याचा अर्थ ते संरक्षित आहेत. मुख्यमंत्र्यांना विचारा, तुम्ही का जात नाही? मोठ्या नेत्याची हत्या झाली की मग मुख्यमंत्र्यांना जाणे शोभेल का?

    चिराग पासवान पुढे म्हणाले की, मी ही बाब केंद्रीय गृहमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देणार आहे. केंद्र सरकारने याची दखल घेऊन चौकशी करावी. आताही जर आपण जागे झालो नाही तर बिहारचा एकही भाग वाचणार नाही. ते म्हणाले की, पीडित कुटुंबाला अश्रू अनावर झाले असून आरोपी बिनधास्तपणे फिरत आहेत. बिहारमध्ये पैशाच्या जोरावर हत्या होत आहेत. राजकीय आश्रयाने गुन्हेगारांचे मनोबल वाढले आहे. मुख्यमंत्री खुर्ची वाचवण्यात व्यस्त आहेत.

    Chirag Paswans criticism of Nitish Kumar government

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Central Govt : केंद्र सरकारने महागाई भत्ता 2% ने वाढवला; 50 लाख सरकारी कर्मचाऱ्यांना आणि 69 लाख पेन्शनधारकांना होईल फायदा

    Rahul Gandhi : राहुल गांधींवरील FIRचा स्वतःचाच आदेश हायकोर्ट जजनी बदलला; नोटीसशिवाय FIR योग्य मानले नाही;

    Meta : मेटाचा 8,000 कर्मचाऱ्यांच्या कपातीचा प्लॅन:20 मेपासून; कर्मचारी कपात प्रक्रिया सुरू होईल; जागतिक स्तरावर 10% कर्मचारी कमी होतील