हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी भाजपाचे तथ्य शोध पथक कोलकाता येथे पोहोचले आहे.
विशेष प्रतिनिधी
कोलकाता : बंगालमधील पंचायत निवडणुकीदरम्यान झालेल्या हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी भाजपचे तथ्य शोध पथक कोलकाता येथे पोहोचले आहे. या पथकाचे नेतृत्व करणारे खासदार रविशंकर प्रसाद यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. Ravi Shankar Prasads criticism of Mamata Banerjee over violence in West Bengal
याशिवाय हिंसाचारग्रस्त भागांना भेट देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मी बिहारचा आहे, जिथे अशा घटना भूतकाळात घडल्या आहेत. माझ्या राज्यात निवडणुका शांततेत पार पडल्या. इथे मतमोजणीच्या दिवशीही खुनाची नोंद झाल्याचे मी ऐकले आहे. ममता बॅनर्जींनी लोकशाहीला लाज आणली आहे.
बंगालमधील हिंसाचाराच्या चौकशीसाठी पक्षाचे अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी माझ्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समिती स्थापन केली आहे, असे रविशंकर प्रसाद म्हणाले. तसेच, आज मला ममताजींना बंगालच्या राजकारणातील त्यांच्या विकासाची आठवण करून द्यायची आहे. तुम्ही वाईट आणि क्रूर डाव्या शासनाविरुद्ध लढलात. पण तुमचे राजकारण डाव्यांपेक्षा वाईट झाले काय? राजकारण अत्याचारांनी भरले आहे का? तुम्ही काय केलं आहे? प्रत्येक वेळी न्यायलयास निवडणुकीत हस्तक्षेप करावा लागतो. बंगालमधील हिंसाचारावर सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे.
Ravi Shankar Prasads criticism of Mamata Banerjee over violence in West Bengal
महत्वाच्या बातम्या
- बंगाल पंचायत निवडणुकीचा निकाल : तृणमूल काँग्रेसने जिंकल्या 18,606 ग्रामपंचायतींच्या जागा; भाजपला 4,482; ओवेसींच्या पक्षाला 3 जागा
- बंगळुरूमध्ये एरोनिक्स इंटरनेट कंपनीच्या ‘सीईओ’ आणि ‘एमडी’ची तलवारीने वार करू हत्या! माजी कर्मचाऱ्यावर आरोप!
- काँग्रेस चालणार बस यात्रा वाट; आघाडीची “वाट” लावोनिया!!
- GST Council meeting :ऑनलाइन गेमिंग, हॉर्स रेसिंग, कॅसिनोवर आता २८ टक्के जीएसटी;, चित्रपटगृहांमध्ये खाद्यपदार्थ स्वस्त