या आधी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीही पंतप्रधान मोदांना पत्र लिहिले होते.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Rahul Gandhi लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून संसदेच्या दोन्ही सभागृहांचे विशेष अधिवेशन लवकरात लवकर बोलावण्याची विनंती केली आहे. पत्रात म्हटले आहे की, “या महत्त्वाच्या वेळी, भारताने हे दाखवून दिले पाहिजे की आपण दहशतवादाविरुद्ध नेहमीच एकजूट आहोत.”Rahul Gandhi
राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिले- पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याने प्रत्येक भारतीय हादरला आहे. या कठीण काळात, भारताला हे दाखवून द्यावे लागेल की आपण दहशतवादाविरुद्ध नेहमीच एकजूट राहू. संसदेच्या दोन्ही सभागृहांचे विशेष अधिवेशन बोलावले पाहिजे, जिथे लोकप्रतिनिधी त्यांची एकता आणि दृढनिश्चय दाखवू शकतील असे विरोधकांचे मत आहे.
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने केली आहे. या हल्ल्यात २६ निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून संसदेच्या दोन्ही सभागृहांचे – लोकसभा आणि राज्यसभेचे – विशेष अधिवेशन त्वरित बोलावण्याची मागणी केली. खरगे यांनी त्यांच्या पत्रात म्हटले आहे की, हे अधिवेशन राष्ट्रीय एकता आणि दहशतवादाविरुद्ध सामूहिक संकल्पाचे प्रतीक बनू शकते.
Rahul Gandhi wrote a letter to Prime Minister Modi
महत्वाच्या बातम्या
- Rafale Marine : भारत-फ्रान्समध्ये 64 हजार कोटींचा करार; नौदलाला मिळणार 26 राफेल मरीन जेट विमाने
- Birdev Done IPS बिरदेव डोणेची सजवलेल्या जीपमधून हजाराेंच्या उपस्थितीत मिरवणूक
- BJPs attack : ‘काँग्रेस नेत्यांची विधानं असंवेदनशील अन् निर्लज्जपणाची आहेत’, भाजपचा हल्लाबोल!
- Pahalgam attack : चीनची राजनैतिक भाषा गोडी गुलाबीची; पण प्रत्यक्षात कृती पाकिस्तानला चिथावणी द्यायचीच!!