• Download App
    भांडवली खर्चाबाबत समज नसलेले राहुल गांधी हेच खरे खिसेकापू, केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांची टीका|Rahul Gandhi, who does not have an understanding about capital expenditure, is the real culprit, criticizes Union Minister Hardeep Singh Puri

    भांडवली खर्चाबाबत समज नसलेले राहुल गांधी हेच खरे खिसेकापू, केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांची टीका

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पेट्रोल आणि डिझेलवर मोठे कर लावल्याने केंद्र सरकारला खिसेकापू असल्याची टीका केली होती. यावर केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी आज राहुल गांधी हे भांडवली खचार्बाबत काहीही समज नसलेले खिसेकापू असल्याची टीका केली आहे.Rahul Gandhi, who does not have an understanding about capital expenditure, is the real culprit, criticizes Union Minister Hardeep Singh Puri

    एका वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी 1 नोव्हेंबर रोजी केंद्र सरकार पेट्रोलियम पदार्थांवर मोठ्या प्रमाणात कर लावून मोठी कमाई करत आहे. यात सर्वसामान्यांची लूट होत असून, त्यांनी खिसेकापूंपासून सावधान राहण्याचे वक्तव्य केले होते.



    प्रत्युत्तरात पुरी म्हणाले की, आपण आर्थिक वाढ आणि प्रगती याकडे कोणत्या दृष्टीतून पाहतो, ही बाब महत्त्वाची आहे. मी कॉँग्रेस सरकारच्या काळातील संयुक्त सरकारमधील सर्व घोटाळे आणि मोदी सरकारच्या कार्यकाळात करण्यात आलेल्या विकासकार्यांवर चर्चा करण्यास तयार आहे.

    पुरी यांनी यावेळी कोरोना विषाणू महामारीमुळे काहीशी बाजूला पडलेल्या अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी मोदी सरकारकडून होत असलेल्या भांडवली खचार्बाबत माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश विकासाच्या नव्या दिशा पादाक्रांत असून, संपूर्ण जगानेही ही बाब स्वीकारल्याचे ते म्हणाले.

    Rahul Gandhi, who does not have an understanding about capital expenditure, is the real culprit, criticizes Union Minister Hardeep Singh Puri

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    West Bengal : बंगालमध्ये OBC आरक्षण 17% वरून 7%; ममता सरकारची OBC-A आणि OBC-B व्यवस्था रद्द

    One Nation, One Election : वन नेशन, वन इलेक्शन- JPC ची टीम गुजरातमध्ये; प्रियंका गांधी यांच्यासह 39 सदस्य सर्व पक्षांच्या नेत्यांची भेट घेणार

    CJI Surya Kant : CJI सूर्यकांत म्हणाले- शांततापूर्ण विरोधाचा अधिकार; पण रस्ता अडवून लोकांना त्रास देऊ शकत नाही