नाशिक : एरवी कुठल्याही राज्यांमधले नेते केंद्रातल्या नेत्यांना फॉलो करतात. राज्यांमध्ये नेते केंद्राच्या नेत्यांचे अनुकरण करतात. केंद्रातल्या नेत्यांच्या तोंडी असलेली भाषा राज्यातले नेते वापरतात.
पण तामिळनाडूच्या विधानसभा निवडणूक आज उलटीच गंगा वाहिली. एका प्रादेशिक पक्षाच्या प्रवक्त्याची भाषा लोकसभेत विरोधी पक्षानेत्याच्या तोंडी आली.
लोकसभेतले विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांच्यासारखीच भाषा वापरली. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे संस्थापक शिंदे किंवा पवार नाहीत, तर ते मोदी आणि शाह आहेत. त्यामुळे शिंदे सेना आणि अजित पवारांचे राष्ट्रवादी यांच्यावर मोदी + शाह यांचाच कंट्रोल आहे, असा आरोप संजय राऊत यांनी वारंवार केला.
तामिळनाडू विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारात राहुल गांधींनी संजय राऊत यांच्या आरोपांची कॉपी हाणली. त्यांनी तामिळनाडूतल्या अण्णा द्रविड मुन्नेत्र कळमघ पक्षावर मोदी आणि शाह यांचा कंट्रोल असल्याचा आरोप केला. त्यासाठी त्यांनी बिहारचे उदाहरण दिले. बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मुकाट्याने मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन ते राज्यसभेवर चालले गेले. कारण त्यांच्या राजकीय इतिहासामुळे त्यांना भाजपा बरोबर तडजोड करणे भाग पडले. बिहारमध्ये मुख्यमंत्र्यांची जागा भाजपने बळकावली, असा आरोप राहुल गांधींनी केला.
तामिळनाडू मध्ये अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचा मुख्यमंत्री झाला तर त्यांच्यावर सुद्धा मोदी आणि शाह यांचाच कंट्रोल असेल. हे दोघे जे बोलतील ते अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाच्या मुख्यमंत्र्याला करावे लागेल नाहीतर त्यांना सत्ता गमवावी लागेल, असा दावा राहुल गांधींनी केला.
पण हे सगळे मोठे भाषण करताना राहुल गांधी यांनी संजय राऊत यांच्यात भाषणाची जशीच्या तशी कॉपी हाणली. शिंदे सेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांच्यावर मोदी आणि शाह यांचा कंट्रोल असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. राहुल गांधींनी त्या आरोपाचे रिपीटेशन तामिळनाडू मध्ये जाऊन केले. त्यापलीकडे त्यांनी स्वतःचे कुठलेच भाषण केलेले दिसले नाही.
Rahul Gandhi says, “Those who control AIADMK are fully controlled by Amit Shah and Mr Narendra Modi.
महत्वाच्या बातम्या
- Africa Detour : आफ्रिकेला वळसा घालून मध्य पूर्वेकडे जात आहे अमेरिकन युद्धनौका; हुती बंडखोरांच्या हल्ल्याची भीती
- Central Govt : केंद्र सरकारने महागाई भत्ता 2% ने वाढवला; 50 लाख सरकारी कर्मचाऱ्यांना आणि 69 लाख पेन्शनधारकांना होईल फायदा
- Rahul Gandhi : राहुल गांधींवरील FIRचा स्वतःचाच आदेश हायकोर्ट जजनी बदलला; नोटीसशिवाय FIR योग्य मानले नाही;
- उन्हाळा आणि पावसाळ्यात अखंड वीजपुरवठा करण्यासाठी AI द्या भर; ऊर्जा विभागाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश