• Download App
    हिंदूत्ववाद्यांनी द्वेष आणि हिंसा पसरवली, राहूल गांधी यांचा आरोप|Pro-Hindu activists spread hatred and violence, Rahul Gandhi alleges

    हिंदूत्ववाद्यांनी द्वेष आणि हिंसा पसरवली, राहूल गांधी यांचा आरोप

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : हिंदूत्ववाद्यांनी नेहमीच द्वेष आणि हिंसा पसरवली आहे आणि त्याची किंमत सर्व समुदायांना चुकवावी लागली आहे, असा आरोप कॉँग्रेसचे खासदार राहूल गांधी यांनी केला आहे. हरिद्वारमधील धर्मसंसदेचा संदर्भ देत भारत हिंसेच्याव विरोधात आहे आणि असं परत व्हायला नको, असे त्यांनी म्हटले आहे.Pro-Hindu activists spread hatred and violence, Rahul Gandhi alleges

    राहूल गांधी यांनी हरिद्वारमध्ये 17 ते 20 डिसेंबरपर्यंत आयोजित करण्यात आलेल्या ‘धर्म संसदेतील’ हेट स्पीचवर टीका केली आहे. राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हटले ैआहे की, हिंदुत्ववादी नेहमी द्वेषाचा प्रसार करतात त्याची मोठी किंमत हिंदू, मुस्लिम, शीख आणि ख्रिस्ती लोकांना चुकवावी लागते.



    अल्पसंख्याकांविरोधात चिथावणीखोर वक्तव्ये केल्याप्रकरणी वादात सापडलेल्या हरिद्वार येथे झालेल्या धर्म संसदेतील वक्त्यांविरोधात कायदेशीर कारवाईचा फास आवळल्या जाऊ लागला आहे. जितेंद्र नारायण त्यागी आणि अन्य वक्त्यांविरोधात पोलिसांकडून एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

    त्यागी (पूर्वाश्रमीचे वसीम रिझवी) यांनी याच महिन्यामध्ये मुस्लिम धमार्चा त्याग करत हिंदू धर्म स्वीकारला होता. या संसदेत सहभागी झालेल्या अन्य वक्त्यांनीही प्रक्षोभक वक्तव्ये केली होती,

    त्यांच्या भाषणाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ निर्माण झाली होती. या सर्वांविरोधात हरिद्वार कोतवाली पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्वांवर दोन समुदायांमध्ये तेढ निर्माण केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

    Pro-Hindu activists spread hatred and violence, Rahul Gandhi alleges

    महत्त्वाच्या बातम्या

     

     

    Related posts

    PM Modi : परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात पंतप्रधान मोदींचा विद्यार्थ्यांना सल्ला- परीक्षा उत्सवासारखी घ्या, गुण नव्हे, जीवन सुधारा

    J&K Projects : रेल्वेचा मोठा निर्णय- जम्मू-काश्मीरमध्ये 3 रेल्वे प्रकल्प थांबवले, 7 लाख सफरचंदाची झाडे वाचवण्याचा प्रयत्न

    RBI New Guidelines 2026 : कर्ज वसुली एजंट आता ग्राहकांना त्रास देऊ शकणार नाहीत; RBI कठोर मार्गदर्शक तत्त्वे आणणार