हिंदू संघटन संहारक नाही, तर संरक्षक; नकारात्मकतेमुळे कम्युनिस्ट संपले, सकारात्मक विचारांमुळे संघ टिकला!!
“हिंदूंचे संघटन हे कोणाच्याही विरोधात नाही. हिंदू असण्याचा गौरव बाळगणे म्हणजे शांतता, सत्य आणि न्यायाच्या मार्गाने चालणारा समाज उभा करणे होय. जगाच्या कल्याणासाठी उभी राहिलेली हिंदूंची ही संघटित शक्ती संहारक नसून, नेहमीच संरक्षक भूमिका बजावणारी आहे