• Download App
    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शेतकऱ्यांना भेट, शरयू प्रकल्पाचे काम पूर्ण, १४ लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार|Prime Minister Narendra Modi's visit to farmers, completion of Sharyu project, 14 lakh hectare area will come under irrigation

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शेतकऱ्यांना भेट, शरयू प्रकल्पाचे काम पूर्ण, १४ लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांचे स्वप्न असलेला शरयू प्रकल्पाचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारामुळे पूर्ण झाला आहे. सरयू प्रकल्पामुळे 14 लाख हेक्टरपेक्षा जास्त जमिन सिंचनाखाली येणार आहे. 6200 हून अधिक गावांतील 29 लाख शेतकºयांना लाभ होणार आहे.Prime Minister Narendra Modi’s visit to farmers, completion of Sharyu project, 14 lakh hectare area will come under irrigation

    गेल्या चार दशकांपासून प्रलंबित असलेला उत्तर प्रदेशातील सरयू नहार राष्ट्रीय प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारामुळे चार वर्षांत पूर्ण झाला आहे. पंतप्रधान मोदी यांनी शरयू नहर राष्ट्रीय प्रकल्पाचे उद्घाटन केले.



    शेतकरी कल्याण आणि सक्षमीकरणासाठी पंतप्रधानांची दृष्टी आणि राष्ट्रीय महत्त्वाच्या प्रदीर्घ प्रलंबित प्रकल्पांना प्राधान्य देण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेमुळे या प्रकल्पावर अधिक लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे, असं सरकारनं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.

    शेतकरी कल्याण आणि सक्षमीकरणासाठी पंतप्रधानांची दृष्टी आणि राष्ट्रीय महत्त्वाच्या प्रदीर्घ प्रलंबित प्रकल्पांना प्राधान्य देण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेमुळे या प्रकल्पावर अधिक लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे, असे सरकारनं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.

    घागरा, शरयू, राप्ती, बाणगंगा आणि रोहिणी या पाच नद्यांना जोडण्याचं काम या प्रकल्पामार्फत होणार आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांना याचा फायदा होईल. या प्रकल्पामुळं 6200 हुन जास्त गावांचा पाणीप्रश्न सुटणार आहे. पूर्व उत्तर प्रदेशातील नऊ जिल्ह्यांना या प्रकल्पाचा फायदा होईल.

    त्यात बहराइच, श्रावस्ती, बलरामपूर, गोंडा, सिद्धार्थनगर, बस्ती, संत कबीर नगर, गोरखपूर आणि महाराजगंज या जिल्ह्यांचा समावेश आहे. पूर्व उत्तर प्रदेशातील नऊ जिल्ह्यांना या प्रकल्पाचा फायदा होईल.शरयू नहार राष्ट्रीय प्रकल्पावर गेल्या गेल्या चार वर्षांत 4600 कोटी रुपयांहून अधिकचा खर्च झाला आहे.

    प्रकल्पातील विलंबाचा त्रास झालेल्या प्रदेशातील शेतकऱ्यांना आता उन्नत सिंचन क्षमतेचा मोठा फायदा होईल, असं सरकारकडून सांगण्यात आले आहे. शेतकरी आता मोठ्या प्रमाणावर पिकांचं उत्पन्न घेण्यास सक्षम होतील आणि प्रदेशाची कृषी क्षमता वाढवू शकतील, असं सरकारनं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.शेतकरी आता मोठ्या प्रमाणावर पिकांचं उत्पन्न घेण्यास सक्षम होतील आणि प्रदेशाची कृषी क्षमता वाढवू शकतील.

    Prime Minister Narendra Modi’s visit to farmers, completion of Sharyu project, 14 lakh hectare area will come under irrigation

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    NEET परीक्षेला नेमके किती विद्यार्थी बसले??, कशी होती व्यवस्था??; NTA ने केला खुलासा!!

    Govt Bans : सरकारने 16 औषध संयोजनांवर बंदी घातली; त्वचा आणि कॉस्मेटिक उत्पादने देखील समाविष्ट, म्हटले – यांच्या उपचारात फायद्यापेक्षा जास्त धोका

    Ram Mandir : राम मंदिर देणगी चोरी- चंपतराय यांच्यावर कारवाई जवळपास निश्चित:विश्वस्त अनिल यांनाही हटवले जाऊ शकते, SIT योगींना अहवाल सादर करणार