वृत्तसंस्था
नवी दिल्ली : PM Modi लोकसभेत ‘संविधानाच्या 75 वर्षांचा गौरवशाली प्रवास’ या विषयावरील दोनदिवसीय चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. सुमारे 1 तास 50 मिनिटे चाललेल्या भाषणात त्यांनी काँग्रेसचे वर्णन संविधानाची ‘शिकार’ करणारा पक्ष असे केले. ते म्हणाले, घटनादुरुस्तीचे असे रक्त काँग्रेसच्या तोंडाला लागले आहे की 6 दशकांत 75 वेळा संविधान बदलण्यात आले. PM Modi
गांधी-नेहरू कुटुंबावर टीका करताना ते म्हणाले, 75 वर्षांच्या प्रवासात एका कुटुंबाने 55 वर्षे राज्य केले. या घराण्यातील वाईट विचार, वाईट कृत्ये आणि कुकर्मांची परंपरा सुरू आहे. जेव्हा देश संविधानाची 25 वर्षे साजरी करत होता, तेव्हा आणीबाणी लागू करण्यात आली होती. देशाचे तुरुंगात रूपांतर झाले, नागरिकांचे हक्क हिरावले गेले. काँग्रेसच्या कपाळावरील हे पाप कधीच धुतले जाणार नाही. जेव्हा जेव्हा जगात ‘लोकशाही’ची चर्चा होईल, तेव्हा जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनी पंतप्रधान असताना घेतलेल्या निर्णयांचा उल्लेख होईल. PM Modi
मोदी म्हणाले की, या परिवाराने ‘रक्ताची चव चाखत’ संविधानाला वारंवार घायाळ केले. ‘पूर्वी पंडित नेहरूंचे स्वतःचे संविधान चालायचे. नेहरूंनी पेरलेल्या बीजाला इंदिरा गांधींनी खतपाणी घातले. 1971 मध्ये सर्वोच्च न्यायालयाचा एक निर्णय राज्यघटना बदलून रद्द करण्यात आला. या कुटुंबाने प्रत्येक स्तरावर राज्यघटनेला आव्हान दिले. न्यायालयाचे पंख छाटले. PM Modi
विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि त्यांची बहीण प्रियंका गांधी वाड्रा यांचे नाव न घेता पंतप्रधान म्हणाले – गांधी कुटुंबाची पुढची पिढीही हाच खेळ खेळत आहे. देशाच्या एकता आणि अखंडतेच्या हितासाठी राज्यघटनेच्या निर्मात्यांनी धर्म आणि श्रद्धेच्या आधारावर आरक्षण न देण्याचा निर्णय घेतला होता, पण सत्तेच्या लालसेपोटी आणि व्होटबँकेच्या तुष्टीकरणासाठी काँग्रेस हे पाऊल उचलत आहे. घटनात्मक भावनेचे उल्लंघन करून काँग्रेस तुष्टीकरणाला पुढे नेत आहे. PM Modi
संविधान सभेचा संदर्भ देत पंतप्रधानांनी पुरुषोत्तम दास टंडन आणि बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या व्यक्तिमत्त्वांच्या विधानांचा हवाला देत मोदी म्हणाले की, – संविधान निर्माण करणाऱ्यांना हे चांगले ठाऊक होते की भारताचा जन्म 1947 मध्ये झाला नव्हता किंवा 1950 मध्ये लोकतांत्रिक झाला नव्हता. हजारो वर्षांच्या परंपरेचा हा परिणाम होता. राज्यघटनेने महिलांना मतदानाचा अधिकार दिला आहे आणि देश आता महिलांच्या नेतृत्वाखाली विकास पाहत आहे.
काँग्रेसवर निशाणा साधत पंतप्रधान म्हणाले की, ज्यांनी संसद आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये महिला आरक्षणाबाबतच्या विधेयकाची प्रत फाडून महिला आरक्षणाला ४० वर्षे मागे ढकलले, तेच आज त्यांचे मार्गदर्शक झाले आहेत. लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांना आरक्षण देणारा कायदा एकमताने मंजूर केल्याबद्दल त्यांनी खासदारांचे कौतुक केले. PM Modi
भारत लोकशाहीची जननी, २०४७ पर्यंत विकसित होऊ
भारताला लोकशाहीची जननी असे संबोधत मोदी म्हणाले की, देशाने 2047 पर्यंत विकसित होण्याचा संकल्प केला आहे. हे लक्ष्य गाठण्यासाठी एकतेची खूप गरज आहे. आमचे संविधान आमच्या एकतेचा आधार आहे.
PM Modi’s reply in Lok Sabha – The sin of Emergency will never be washed from the Congress
महत्वाच्या बातम्या
- Maharashtra ministry formula : मंत्रिमंडळ विस्तारात भाजपचेच वर्चस्व??; हे तर महाराष्ट्राच्या जनमताच्या कौलाचे प्रतिबिंब!!
- Mahakumbh : पंतप्रधान मोदींच्या हस्ते महाकुंभासाठी कलशाची स्थापना; पीएम म्हणाले- गुलामगिरीच्या काळातही कुंभावरील श्रद्धा थांबली नाही
- Fadnavis governments : ठरलं! 15 डिसेंबरला फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार
- Supreme Court : गोवा काँग्रेसला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का!