• Download App
    Modi government ऑपरेशन सिंदूर : पाकिस्तानी गोळीबारात उद्ध्वस्त

    Modi government : ऑपरेशन सिंदूर : पाकिस्तानी गोळीबारात उद्ध्वस्त झालेल्या घरांची मोदी सरकार पुनर्बांधणी करणार

    २५ कोटी रुपयांची अतिरिक्त मदत मंजूर केली आहे.


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली – Modi government केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरच्या सीमावर्ती भागात पाकिस्तानी गोळीबारामुळे उद्ध्वस्त झालेल्या घरांसाठी २५ कोटी रुपयांची अतिरिक्त मदत मंजूर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या घोषणेनंतर हा निर्णय घेण्यात आला, ज्यामध्ये असे म्हटले होते की पाकिस्तानी गोळीबारामुळे पूर्णपणे उद्ध्वस्त झालेल्या घरांसाठी २ लाख रुपये आणि अंशतः उद्ध्वस्त झालेल्या घरांसाठी १ लाख रुपये अतिरिक्त मदत दिली जाईल.Modi government

    पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घोषणेनंतर, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तातडीने गृह मंत्रालयाकडून २५ कोटी रुपयांची अतिरिक्त तरतूद केली, जेणेकरून बाधित कुटुंबांना त्वरित मदत मिळू शकेल. ही मदत रक्कम जम्मू-काश्मीरच्या सीमावर्ती भागातील २,०६० घरांसाठी वापरली जाईल, जी पाकिस्तानी गोळीबारामुळे पूर्णपणे किंवा अंशतः नुकसान झाली होती.



    यासोबतच, गृह मंत्रालयाने असेही स्पष्ट केले की पंजाबच्या सीमावर्ती भागात पाकिस्तानच्या गोळीबारामुळे प्रभावित झालेल्या लोकांनाही तितकीच मदत दिली जाईल. दोन्ही राज्यांमध्ये सीमेपलीकडून होणाऱ्या गोळीबारामुळे झालेल्या नुकसानाच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आले आहे.

    केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी २९-३० मे रोजी जम्मू आणि काश्मीरमधील सीमावर्ती जिल्हा पूंछला भेट दिली. या दरम्यान त्यांनी पाकिस्तानच्या गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि त्यांना अनुकंपा तत्वावर नियुक्ती पत्रेही दिली.

    Operation Sindoor: Modi government to rebuild houses destroyed in Pakistani shelling

    महत्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Singapore cargo ship : केरळमध्ये सिंगापूरच्या मालवाहू जहाजाला आग; 22 पैकी 4 क्रू मेंबर्स बेपत्ता; 18 जणांना वाचवले

    Railway Minister Vaishnav : मुंब्रा दुर्घटनेनंतर मुंबईकरांसाठी लोकल डब्यांच्या तीन नव्या डिझाईन, रेल्वेमंत्री वैष्णव यांचा मोठा निर्णय

    JP Nadda : जेपी नड्डा म्हणाले- आधीचे सरकार भ्रष्टाचार-नकारात्मकतेने भरलेले होते; मोदी सरकारने ही भावना बदलली