• Download App
    कॉँग्रेसच्या काळात मनरेगामध्ये फक्त भ्रष्टाचार, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी सोनिया गांधी यांना सुनावलेOnly corruption in MGNREGA during Congress period, Union Minister Anurag Thakur told Sonia Gandhi

    कॉँग्रेसच्या काळात मनरेगामध्ये फक्त भ्रष्टाचार, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी सोनिया गांधी यांना सुनावले

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : काँग्रेसच्या काळात मनरेगा योजनेत फक्त भ्रष्टाचार केला गेला. तरतूद केलेला निधीही खर्च केला गेला नाही, असे प्रत्युत्तर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी कॉँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना दिले आहे.Only corruption in MGNREGA during Congress period, Union Minister Anurag Thakur told Sonia Gandhi

    रोजगार हमी योजनेवरून काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारला लक्ष्य केले. या योजनेसाठी केंद्राकडून राज्यांना वेळेवर निधी दिला जात नसल्याने सुमारे पाच हजार कोटींची थकबाकी असल्याचा मुद्दा सोनिया गांधी यांनी गुरुवारी लोकसभेत शून्य प्रहारामध्ये उपस्थित केला.



    त्यावर, गिरीराज सिंह व अनुराग ठाकूर या दोन्ही केंद्रीय मंत्र्यांनी आक्रमक शाब्दिक हल्लाबोल केला. मनरेगाची केंद्र सरकारने चेष्टा केली पण, करोना व टाळेबंदीच्या काळात ग्रामीण भागांमध्ये रोजगार देण्यात याच रोजगार हमी योजनेचे मोठे योगदान होते. कोटय़वधी लोकांना रोजगार मिळाला, त्यांच्या हातात खचार्साठी पैसा मिळाला.

    केंद्रीय ग्रामीण विकासमंत्री गिरीराज सिंह यांनीही सोनिया गांधी यांचा मुद्दा खोडून काढला. ते म्हणाले, काँग्रेस सरकारच्या काळात २०१३-१४ मध्ये मनरेगासाठी फक्त ३३ हजार कोटींची तरतूद अर्थसंकल्पात केली गेली. मात्र, गेल्या वर्षी केंद्र सरकारने या योजनेसाठी १.१२ लाख कोटी खर्च केले. त्यामुळे सोनिया गांधी यांच्या आरोपात तथ्य नाही.

    Only corruption in MGNREGA during Congress period, Union Minister Anurag Thakur told Sonia Gandhi

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Modi : परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात पंतप्रधान मोदींचा विद्यार्थ्यांना सल्ला- परीक्षा उत्सवासारखी घ्या, गुण नव्हे, जीवन सुधारा

    J&K Projects : रेल्वेचा मोठा निर्णय- जम्मू-काश्मीरमध्ये 3 रेल्वे प्रकल्प थांबवले, 7 लाख सफरचंदाची झाडे वाचवण्याचा प्रयत्न

    RBI New Guidelines 2026 : कर्ज वसुली एजंट आता ग्राहकांना त्रास देऊ शकणार नाहीत; RBI कठोर मार्गदर्शक तत्त्वे आणणार