• Download App
    ...म्हणून राहुल गांधींच्या 'या' रॅलीत मुख्यमंत्री नितीश कुमार सहभागी होणार नाही!|Nitish Kumar will not participate in Rahul Gandhis rally

    …म्हणून राहुल गांधींच्या ‘या’ रॅलीत मुख्यमंत्री नितीश कुमार सहभागी होणार नाही!

    आजकाल बिहारच्या राजकारणात नितीश कुमार यांच्याबाबत अनेक चर्चा सुरू आहेत


    विशेष प्रतिनिधी

    पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार ‘भारत जोडो न्याय यात्रे’अंतर्गत ३० जानेवारीला काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या पूर्णिया येथे होणाऱ्या सभेला उपस्थित राहणार नाहीत. वृत्तानुसार, नितीश यांचा ३० जानेवारीला पाटणा येथे कार्यक्रम असून पूर्णिया येथील रॅलीत सहभागी होणे त्यांना शक्य नाही.Nitish Kumar will not participate in Rahul Gandhis rally



    आजकाल बिहारच्या राजकारणात नितीश कुमार यांच्याबाबत अनेक चर्चा सुरू आहेत आणि इंडिया आघाडीचे भवितव्य धोक्यात आलेले दिसत आहे. खरं तर, केंद्राने मंगळवारी बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न देण्याचा निर्णय घेतला होता, त्यानंतर नितीश कुमार यांनी त्यांचे विचारवंत आणि गुरू कर्पूरी ठाकूर यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त आयोजित पार्टी मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे केवळ कौतुकच केले नाही, तर कृतज्ञता व्यक्त केली, आणि घराणेशाहीचाही समाचार घेतला.

    नितीश कुमार यांच्या नेपोटिझमवर हल्लाबोल केल्याने बिहारमधील ‘महाआघाडी’मध्ये ‘ऑल इज नॉट वेल’ या चर्चांना बळ मिळाले आहे. आता ताजे अपडेट म्हणजे लालू यादव यांची कन्या रोहिणी आचार्य यांनी नितीश कुमारांच्या ‘एक्स’वर केलेल्या प्रत्येक हल्ल्याला प्रत्युत्तर दिले आहे. ‘विचारधारा बदलणे’, ‘कुटुंबातील कोणीही लायक नाही’ अशा गोष्टी लिहून रोहिणी यांनी नितीश यांना प्रत्युत्तर दिले आहे. रोहिणी यांनी नितीश कुमार यांचे नाव घेतले नसेल, पण उत्तरावरून बरेच काही स्पष्ट होते.

    दुसरीकडे, नितीश कुमार यांनी काल दिलेल्या वक्तव्यावर जेडीयूचे सरचिटणीस केसी त्यागी यांनी स्पष्टीकरण दिले आहे. अशा स्थितीत बिहारमधील राजकीय पेच अधिक तीव्र होताना दिसत आहे.

    Nitish Kumar will not participate in Rahul Gandhis rally

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Mamata Banerjee : ममतांनी घराबाहेर 3 लोकांना थप्पड मारली; टीएमसीच्या मिरवणुकीत अंडी फेकल्यावर संतापल्या

    ममता बॅनर्जींच्या पक्षाचा पडला तिसरा तुकडा; राज्यसभेच्या तीन खासदारांनी केला भाजपमध्ये घरोबा!!

    Rahul Gandhi : राहुल गांधी म्हणाले- UGC-NET पेपर ₹2.25 लाखांना विकला गेला; ज्या वकिलाच्या दाव्याच्या आधारे सांगितले, तो जीवाला धोका सांगून भूमिगत