विशेष प्रतिनिधी
लखनौ – उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाने थैमान घातले असून विविध ठिकाणी झालेल्या दुर्घटनेत १९ जणांचा मृत्यू झाला आहे. राजधानी लखनौत देखील पावसाने जनजीवन विस्कळित झाले आहे. विमानतळाच्या धावपट्टीवर देखील पाणी साचले आहे. Massive rain in UP, 19 killed
लखनौ, प्रयागराज, वाराणसी, कानपूरसारख्या मोठ्या शहरात मुसळधार पावसाने रस्ते आणि कॉलनी जलमय झाले आहेत. लखनौमध्ये पावसाची स्थिती आणि अंदाज पाहता नागरिकांना घरीच थांबण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सर्व दौरे रद्द केले आहेत. लखनौच्या अमोसी विमानतळाच्या धावपट्टीवर पाणी आले आहे. लखनौ-फैजाबाद महामार्गावर अनेक ठिकाणी पाणी आले आहे
लखनौ, प्रयागराज, वाराणसी, कानपूर, अयोध्या, जौनपूर, सुलतानपूर, भदोही, गाझीपूर, चित्रकूट, बहराईच, बांदा, देवरिया, इटावा, फतेहपूरसह अनेक जिल्ह्यात दोन दिवस झाले पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचले असून काही ठिकाणी घरातही पाणी शिरले आहे. लखनौत गेल्या नऊ तासात १०० मिलीमीटरपेक्षा अधिक पावसाने नोंद केली आहे. हवामान खात्याच्या मते, मध्यरात्री १२ पासून सकाळी ९ वाजेपर्यंत लखनौत १०९.२ मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला आहे.
Massive rain in UP, 19 killed
महत्त्वाच्या बातम्या
- जगातील सर्वात प्रभावशाली 100 व्यक्तींमध्ये पंतप्रधान मोदी, आदर पूनावाला, ममता बॅनर्जी यांचेही नाव
- अनिल देशमुख यांचे तत्कालिन खासगी सचिव संजीव पलांडे निलंबित, शंभर कोटींच्या प्रकरणात होते कोठडीत
- मोठी बातमी : भारताचे स्टॉक मार्केट जगातील 5वे सर्वात मोठे, BSE लिस्टेड कंपन्यांचे बाजारमूल्य 260 लाख कोटी रुपयांवर
- Aukus : अमेरिका, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियाची नवीन ‘सुरक्षा युती’ची घोषणा, फ्रान्सला धक्का, तर चीनची तिन्ही देशांवर आगपाखड