• Download App
    ममता बॅनर्जी यांनी गुन्ह्यांची माहिती लपविली, आक्षेप घेत उमेदवारी अर्ज रद्द करण्याची भाजपच्या प्रियंका टिबरेवाल यांची मागणी|Mamata Banerjee hides information about crimes, BJP's Priyanka Tibrewal demands cancellation of candidature

    ममता बॅनर्जी यांनी गुन्ह्यांची माहिती लपविली, आक्षेप घेत उमेदवारी अर्ज रद्द करण्याची भाजपच्या प्रियंका टिबरेवाल यांची मागणी

    विशेष प्रतिनिधी

    कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल कॉंग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांच्या भवानीपूर येथील उमेदवारीवर भाजपच्या उमेदवार प्रियंका टिबरेवाल यांनी आक्षेप घेतला आहे.Mamata Banerjee hides information about crimes, BJP’s Priyanka Tibrewal demands cancellation of candidature

    बॅनर्जी यांनी उमेदवारी अर्जामध्ये त्यांच्याविरोधात दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती लपविल्याचा आरोप प्रियंका टिबरेवाल यांनी केला असून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. हे सर्व गुन्हे २०१८ मध्ये आसाममध्ये दाखल झाले आहेत. त्याबाबत माहिती तक्रारीमध्ये देण्यात आली आहे.



    निवडणूक आयोगाने भवानीपूर मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर केली असून हा ममतांचा पारंपरिक मतदारसंघ आहे. त्यांच्याविरोधात भाजपने प्रियंका टिबरेवाल यांना उमेदवारी दिली आहे. टिबरेवाल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांचे निवडणूक एजंट सजल घोष यांनी लेखी तक्रार दाखल केली.

    घोष यांनी म्हटले आहे, की ममता बॅनर्जी यांनी त्यांच्याविरोधात दाखल असलेल्या पाच गुन्ह्यांची माहिती ल्पविली आहे. उमेदवारी अर्जसोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात या गुन्ह्यांचा उल्लेख केलेला नाही.

    भवानीपूर मतदारसंघात ३० सप्टेंबरला मतदान होणार असून ३ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांचा नंदीग्राम येथे भाजपचे शुभेंदू अधिकारी यांनी पराभव केला होता. मात्र, मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांना सहा महिन्यांमध्ये विधिमंडळात निवडून जाणे आवश्यक आहे.

    Mamata Banerjee hides information about crimes, BJP’s Priyanka Tibrewal demands cancellation of candidature

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Rahul Gandhi : RSS च्या कौतुकावरून दिग्विजय सिंह यांना राहुल गांधींनी फटकार, म्हणाले- तुम्ही चुकीचे केले

    Amit Shah : गृहमंत्री शहा म्हणाले- राहुल थकू नका, तुम्हाला तामिळनाडू-बंगालमध्येही हरायचे आहे, त्यांना विकासाचे राजकारण समजत नाही

    Stock Market : 2025 मध्ये शेअर बाजारातून परदेशी-गुंतवणूकदारांची सर्वात मोठी एक्झिट, विक्रमी ₹1.58 लाख कोटी काढले; 2026 मध्ये FII च्या परतण्याची अपेक्षा