विशेष प्रतिनिधी
बंगळुरु : कर्नाटक हायकोर्ट हिजाब वाद प्रकरणी आज म्हणजेच मंगळवारी निकाल देणार आहे. या पार्श्वभूमीवर दक्षिण कन्नडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आज (१५ मार्च) सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी देण्याचे आदेश दिले आहेत. बाह्य परीक्षा वेळापत्रकानुसार होतील, मात्र सर्व शाळा-महाविद्यालयांच्या अंतर्गत परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती डॉ.राजेंद्र के.व्ही. यांनी सांगितली. Karnataka High Court verdict in hijab case today
कलबुर्गीचे जिल्हाधिकारी यशवंत व्ही. गुरुकर यांनीही सांगितले की, हिजाब प्रकरणाचा मंगळवारी निकाल पाहता जिल्हा प्रशासनाने सोमवारी रात्री ८ ते १९ मार्च सकाळी ६ वाजेपर्यंत कलम १४४ लागू केले आहे. जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्था बंद राहणार आहेत.
यापूर्वी, २५ फेब्रुवारी रोजी कर्नाटक उच्च न्यायालयाने या प्रकरणाशी संबंधित सर्व याचिकांवर सुनावणी पूर्ण केली होती आणि न्यायालयाच्या पूर्ण खंडपीठाने आपला निर्णय राखून ठेवला होता. हायकोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान सर्व पक्षांच्या वकिलांनी अंतिम युक्तिवाद केला होता, त्या आधारे कोर्टाने आपला निर्णय दिला.
खरे तर कर्नाटकातील हिजाबचा वाद या वर्षाच्या सुरुवातीला उडुपीमध्ये सुरू झाला होता. तिथल्या एका सरकारी कॉलेजमध्ये सहा मुस्लिम विद्यार्थिनींना हिजाब परिधान केल्यामुळे वर्गात बसण्यास मज्जाव करण्यात आला होता. कॉलेज व्यवस्थापनाने नवीन गणवेश धोरण हे कारण सांगितले होते. यानंतर या मुलींनी कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका दाखल करून हिजाबवरील बंदी संविधानाच्या कलम १४ आणि २५ अंतर्गत मूलभूत अधिकारांचे उल्लंघन असल्याचे म्हटले होते.
हिजाबसारखे वादग्रस्त मुद्दे पुन्हा उपस्थित होणार : शिवसेनेने सोमवारी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’मधून पुन्हा एकदा भाजप सरकारवर निशाणा साधला. पाच राज्यांतील निवडणुका पाहता हिजाबसारखे वादग्रस्त मुद्दे उपस्थित करण्यात आले होते आणि आता निवडणुका संपल्या आहेत, तेव्हा हे मुद्देही बाजूला ठेवले जातील, असे संपादकीयात म्हटले आहे. त्यानंतर २०२४ च्या लोकसभा निवडणुका जवळ आल्यावर असे मुद्दे पुन्हा उपस्थित केले जातील. निवडणुकीच्या काळात या प्रश्नांना धार्मिक रंग देऊन विकासकामांऐवजी प्राधान्य दिले जाते.
Karnataka High Court verdict in hijab case today
महत्त्वाच्या बातम्या
- ममता बॅनर्जींच्या दयेवर निवडणूक लढवित असलेल्या शत्रुघ्न सिन्हा यांनी स्वत;ची तुलना केली पंतप्रधान नरेंद्र मोदींशी
- सुप्रिया सुळे यांना महागाईची चिंता, गोडतोल ६७ तर तूर डाळ ४९ टक्यांनी वाढल्याचा मांडला मुद्दा
- छत्तीसगढमध्ये चक्क परमेश्वाराला आपल्या समोर हजर राहण्याची तहसीलदाराची नोटीस
- स्थायी विकास मॉडलची गरज, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बैठकीत बेरोजगारीच्या मुद्यावर प्रस्ताव पारित