• Download App
    operation sindoor भारताने पाकिस्तानातील २० नव्हे तर २८ ठिकाणे केली उद्ध्वस्त!

    operation sindoor : भारताने पाकिस्तानातील २० नव्हे तर २८ ठिकाणे केली उद्ध्वस्त!

    operation sindoor

    पाकिस्तानच्याच कागदपत्रांमधूनच झाला मोठा खुलासा


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली: operation sindoor ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताने पाकिस्तानची २० नव्हे तर २८ ठिकाणं उद्ध्वस्त केली आहेत. विशेष म्हणजे हा खुलासा खुद्द पाकिस्तानकडूनच आपल्या कागदपत्राद्वारे केला गेला आहे.operation sindoor

    पाकिस्तानमधील एका अधिकृत कागदपत्रात असे उघड झाले आहे की, ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताने पाकिस्तानातील अनेक ठिकाणांना लक्ष्य केले होते, ज्यांचा उल्लेख भारतीय हवाई दलाने किंवा लष्करी ऑपरेशन्स महासंचालकांनी (DGMO) गेल्या महिन्यात झालेल्या हवाई हल्ल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला नव्हता.



    पाकिस्तानच्या ऑपरेशन ‘बुनियान उन मर्सूस’वर तयार केलेल्या कागदपत्रानुसार, भारताने किमान ८ अतिरिक्त ठिकाणी हल्ला केला, ज्यांचा अधिकृतपणे उल्लेख नव्हता. या कागदपत्रात दाखवलेल्या ठिकाणांमध्ये पेशावर, झांग, हैदराबाद (सिंध), गुजरात (पंजाब), गुजरांवाला, बहावलनगर, अट्टोक आणि छोर यांचा समावेश आहे.

    पाकिस्तानच्या कागदपत्रात झालेल्या नुकसानीचा खुलासा करण्यात आला आहे. यावरून हे स्पष्ट होते की ऑपरेशन सिंदूरद्वारे भारताने पाकिस्तानचे मोठे नुकसान केले होते. म्हणजेच भारतीय सैन्याने ब्रीफिंगमध्ये जे सांगितले होते त्यापेक्षा पाकिस्तानचे जास्त नुकसान झाले आहे. पाकिस्तानने युद्धबंदीची विनंती का केली हे यावरून स्पष्ट होते. यामुळे भारताचे मोठे नुकसान झाल्याच्या पाकिस्तानच्या दाव्यांचेही खंडण होते.

    २२ एप्रिल रोजी काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांना लक्ष्य करून ही प्रत्युत्तरात्मक कारवाई केली होती. पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात पहलगाममध्ये २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. भारताच्या प्रत्युत्तरात्मक कारवाईत पीओके आणि पाकिस्तानमध्ये एकूण ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त झाले. यानंतर, जेव्हा पाकिस्तानने बदला घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा भारताने पाकिस्तानच्या लष्करी तळावर मोठ्या प्रमाणात हल्ला केला.

    India destroyed not 20 but 28 places in Pakistan

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    West Bengal : बंगालमध्ये OBC आरक्षण 17% वरून 7%; ममता सरकारची OBC-A आणि OBC-B व्यवस्था रद्द

    One Nation, One Election : वन नेशन, वन इलेक्शन- JPC ची टीम गुजरातमध्ये; प्रियंका गांधी यांच्यासह 39 सदस्य सर्व पक्षांच्या नेत्यांची भेट घेणार

    CJI Surya Kant : CJI सूर्यकांत म्हणाले- शांततापूर्ण विरोधाचा अधिकार; पण रस्ता अडवून लोकांना त्रास देऊ शकत नाही