• Download App
    पश्चिम बंगालमध्ये राज्यपाल- मुख्यमंत्री आमने-सामने, राज्यपालांनी अधिकाराचा वापर करत अधिवेशन केले संस्थगित|In West Bengal, Governor-Chief Minister face-to-face, governors use their powers to hold conventions

    पश्चिम बंगालमध्ये राज्यपाल- मुख्यमंत्री आमने-सामने, राज्यपालांनी अधिकाराचा वापर करत अधिवेशन केले संस्थगित

    विशेष प्रतिनिधी

    कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये राज्यपाल जगदीप धनकड यांनी आपल्या अधिकाराचा वापर करत राज्य विधिमंडळाचे अधिवेशन संस्थगित केले आहे. राज्य सरकारच्याच शिफारशीवरून हा निर्णय घेतल्याचे राज्यपालांनी म्हटले आहे. मात्र, यामुळे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि राज्यपालांमधील संघर्ष तीव्र झाला आहे.In West Bengal, Governor-Chief Minister face-to-face, governors use their powers to hold conventions

    ममता बॅनर्जी यांच्या सरकारने निर्णय घेऊन हिवाळी अधिवेशन अचानक तहकूब केले होते. कोरोनामुळे हिवाळी अधिवेशन संपविण्याऐवजी अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आले होते. ते संपविल्याशिवाय पुढील अधिवेशन घेता येत नाही, अशी भूमिका राज्यपालांनी घेतली आहे.



     

    हिवाळी अधिवेशन संपविण्याबाबत राज्य सरकारने राज्यपालांकडे १० फेब्रुवारीला फाईल पाठविली होती. त्यानंतरच राज्यपालांनी हा निर्णय जाहीर केला आहे. या अधिवेशनात सरकारच्या दैनंदिन कामकाजात राज्यपाल ढवळाढवळ करीत असल्याचा आरोप करून राज्यपालांविरोधात ठराव आणण्याचा तृणमूल कॉंग्रेसचा विचार होता.

    मात्र, राज्यपालांनी नियम १७४/२ अंतर्गत मिळालेल्या अधिकाराचा वापर करून अधिवेशन बरखास्त केले असून पुढील अधिवेशन बोलाविण्यासाठी राज्य सरकारला राज्यपालांची परवानगी घेणे आवश्यक आहे. तसेच ते राज्यपालांच्या अभिभाषणानेच सुरू करावे लागणार आहे.

    तृणमूलच्या नेत्यांनी मात्र राज्यपालांचा निर्णय घटनाबाह्य असून त्यास न्यायालयात आव्हान देणार असल्याचे सांगितले. तृणमूलचे राज्यसभा सदस्य सुखेंदू शेखर रे यांनी शुक्रवारी नियम १७० अंतर्गत ठराव मांडून राज्यपाल धनकड यांना हटविण्याची विनंती राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना केली होती.

    In West Bengal, Governor-Chief Minister face-to-face, governors use their powers to hold conventions

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    President Murmu : राष्ट्रपती मुर्मूंनी पाणबुडी INS वाघशीरमधून प्रवास केला, असे करणाऱ्या दुसऱ्या राष्ट्रपती

    Lucknow : लखनौमध्ये शियांचे अधिवेशन, मौलाना म्हणाले- वंदे मातरमच्या नावाखाली घाबरवले जातेय, पाकसारखी वागणूक मिळतेय

    Mohan Bhagwat : भागवत म्हणाले- संघाचे ध्येय हिंदू समाजाला एकत्र करणे, सनातन धर्म पुन्हा जिवंत करण्याची वेळ आली आहे