• Download App
    पंजाबात काँग्रेसमध्ये; तर बंगालमध्ये भाजपमध्ये बंडाळी; बाबुल सुप्रियो तृणमूल काँग्रेसमध्ये सामील |In the Congress in Punjab; While in Bengal the BJP revolted; Babul Supriyo joins Trinamool Congress

    पंजाबात काँग्रेसमध्ये; तर बंगालमध्ये भाजपमध्ये बंडाळी; बाबुल सुप्रियो तृणमूल काँग्रेसमध्ये सामील

    वृत्तसंस्था

    कोलकाता : पश्चिमेकडील राज्य पंजाबमध्ये काँग्रेसमध्ये उभी फूट पडत बंडाळी माजली आहे, तर दुसरीकडे पूर्वेकडील राज्य पश्चिम बंगालमध्ये भाजपमध्ये बंद करून बाबुल सुप्रियो तृणमूल काँग्रेसमध्ये सामील झाले आहेत.In the Congress in Punjab; While in Bengal the BJP revolted; Babul Supriyo joins Trinamool Congress

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाच्या वेळी बाबुल सुप्रियो यांना मंत्रिमंडळातून वगळले होते. त्यानंतर ते भाजपमध्ये अस्वस्थ असल्याचे बोलले जात होते. आज त्यांनी ममता बॅनर्जी यांचे भाचे खासदार अभिषेक बॅनर्जी आणि खासदार डेरेक ओब्रायन यांच्या उपस्थितीत तृणमूल काँग्रेस मध्ये प्रवेश केला.



    2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी बाबुल सुप्रियो यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. पश्चिम बंगाल मधून लोकसभेवर निवडून आल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी बाबुल सुप्रियो यांना केंद्रात राज्यमंत्री पद दिले होते. त्यांना 2021 च्या विधानसभा निवडणुकीत तिकीट देऊन भाजपने मैदानात उतरवले होते.

    परंतु त्यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता. त्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळातून देखील त्यांना वगळण्यात आले होते. त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा होती. ही चर्चा खरी ठरून बाबुल सुप्रियो यांनी आज पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस मध्ये प्रवेश केला आहे.

    In the Congress in Punjab; While in Bengal the BJP revolted; Babul Supriyo joins Trinamool Congress

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले – पराली जाळणाऱ्यांना अटक का नाही, दंड अपुरा, शेतकऱ्यांना जबाबदार धरण्याची गरज

    Nirmala Sitharaman : GST सुधारणांमुळे अर्थव्यवस्थेत 2 लाख कोटी येतील; अर्थमंत्री म्हणाल्या- दैनंदिन वापराच्या वस्तू स्वस्त होतील, सामान्य लोकांकडे जास्त पैसे शिल्लक राहतील

    EC Voters : देशभरात बिहारप्रमाणे SIR; अर्ध्याहून अधिक मतदारांना कागदपत्रे मागणार नाहीत