विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोरोनाने देशातील एकाही कुटुंबाला सोडलेले नाही, पण केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांच्या हे गावीही नाही. ते अजूनही हस्तीदंती मनोऱ्यात राहात आहेत, असे ताशेरे दिल्ली उच्च न्यायालयाने ओढले.High court once again lashed on burocrats
लसटंचाईचा फटका बसलेल्या देशाला स्पुटनिक व्ही लसीच्या उत्पादनाच्या रूपाने एक संधीच लाभल्याचे आणि या देशाला ईश्वराचा आशीर्वाद लाभो अशी प्रतिक्रियाही न्यायालयाने नोंदविली.
पॅनाकीया बायोटेक कंपनीने एक याचिका सादर केली आहे. मानवतेच्या व्यापक कल्याण व्हावे म्हणून स्पुटनिक व्ही लशीच्या उत्पादनासाठी तातडीने निधी मिळावा अशी विनंती त्यांनी केली आहे.
यावर न्या. मनमोहन आणि न्या. नवीन चावला यांनी केंद्राला धारेवर धरले. इतके बळी घेत असलेल्या जागतिक साथीचे थैमान माजले असतानाही केंद्र जिवंत नाही, अशा तीव्र शब्दांत ताशेरे ओढण्यात आले.
सेठी यांनी स्पष्ट केले की, देशात उत्पादन झालेली कोणतीही लस केंद्राच्या मंजुरीशिवाय निर्यात करता येत नाही. या लशी केवळ भारतीयांसाठी आहेत आणि याचा आपल्याला फायदा होईल.
High court once again lashed on burocrats
महत्वाच्या बातम्या
- कोरोना योद्ध्याची कोरोनाविरुद्धची झुंज अखेर अपयशी
- आयएनएक्स मीडिया भ्रष्टाचार प्रकरणी पी. चिदंबरम यांना धक्का
- पतीला इंजेक्शन न मिळाल्याने सैरभेर झालेल्या पत्नीची जीव देण्याची धमकी, मुख्यमंत्र्यांना व्हिडिओ पाठवल्याने खळबळ
- चक्रीवादळाने गुजरातमध्ये रात्रभर हाहाकार, किनारपट्टीवर प्रचंड नुकसान
- ‘लिव्ह-इन’ संबंध अस्वीकारार्ह असल्याचे पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाचे निरीक्षण
- दिवसभरात शेअर बाजारात गुंतवणुकदारांनी कमावले तब्बल तीन लाख कोटी, सेन्सेक्स पुन्हा ५० हजारांच्यावर