पश्चिम बंगालमधून रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांची ओळख पटवून त्यांची रवानगी मायदेशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. एका वर्षाच्या आत सर्व घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी केंद्र आणि पश्चिम बंगाल सरकारला मुदत द्यावी अशी मागणीही याचिकेत करण्यात आली आहे.Deport Rohingya and Bangladeshi infiltrators from West Bengal within a year, petition to Supreme Court
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधून रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांची ओळख पटवून त्यांची रवानगी मायदेशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. एका वर्षाच्या आत सर्व घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी केंद्र आणि पश्चिम बंगाल सरकारला मुदत द्यावी अशी मागणीही याचिकेत करण्यात आली आहे.
मानवाधिकार कार्यकर्त्या संगीता चक्रवर्ती यांनी ही याचिका दाखल केली आहे. या याचिकेत पश्चिम बंगालमधील हिंसाचाराचा संदर्भही देण्यात आला आहे. बांगलादेशी घुसखोरांना देशात सहज आधारकार्ड, रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र मिळतं याकडेही याचिकेत लक्ष वेधण्यात आले आहे.
घुसखोरांना मदत करणाऱ्या सरकारी अधिकारी, पोलीस कर्मचारी आणि सुरक्षारक्षकांची ओळख पटवून त्यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत कारवाई करण्याची मागणीही या याचिकेत केली आहे. अशा अधिकाऱ्यांची संपत्ती जप्त करावी. सरकारी अधिकारी, ट्रॅव्हल एजेंट आणि मदत करणाºया व्यक्तींवर कारवाई करावी अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.
घुसखोरांना मदत केल्याप्रकरणी भारतीय दंड संहितेतील कायदा आणखी कडक करावा आणि गुन्हा अजामिनपात्र करण्याची सुचना देखील करण्यात आली आहे. बांगलादेशी घुसखोरांमुळे पश्चिम बंगालमध्ये लूटपाट, मारहाण आणि अपहरणांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याकडेही लक्ष वेधण्यात आलं आहे. बांगलादेशी घुसखोरांची संख्या ५ कोटींच्या घरात पोहोचली आहे.
त्यामुळे देशाच्या एकता, अखंडता आणि सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. संविधानातील अनुच्छेद १९ चा यासाठी संदर्भ देण्यात आला आहे. भारतात मोकळेपणाने फिरण्याचा अधिकार फक्त भारतीयांना आहे. घुसखोरांना नाही, असेही या याचिकेत नमुद करण्यात आलं आहे.
Deport Rohingya and Bangladeshi infiltrators from West Bengal within a year, petition to Supreme Court
महत्त्वाच्या बातम्या
- काश्मीर प्रश्न सोडविण्यासाठी चैतन्यमयी दृष्टीकोन , १२ निवृत्त पोलीस अधिकाऱ्यानी केले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक
- उज्जैनमध्ये सापडले एक हजार वर्षांपूर्वीचे पुरातन मंदिराचे अवशेष
- जम्मू- काश्मीरमध्ये कलम ३७० पुन्हा लागू होईल ही अपेक्षा ठेवणे मुर्खपणा, ओमर अब्दुल्ला यांची टीका
- राफेल विमानांचा वेगवान विक्रम, १२ तासांत कापले १७ हजार किलोमीटरचे अंतर
- पुणेकरांना उपदेशाचे डोस स्वत : च्या मतदारसंघात गर्दी अलोट, गृहमंत्री वळसे-पाटील यांच्याच कार्यक्रमात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा