• Download App
    राम मंदिर उद्घाटनाचे निमंत्रण काँग्रेसने फेटाळले, हायकमांडच्या निर्णयावर नेते नाराज!|Congress rejected the invitation to inaugurate the Ram temple leaders are upset with the decision of the high command

    राम मंदिर उद्घाटनाचे निमंत्रण काँग्रेसने फेटाळले, हायकमांडच्या निर्णयावर नेते नाराज!

    भाजप आणि आरएसएसचा कार्यक्रम म्हणत सहभागी होण्यास नकार दिला


    विशेष प्रतिनिधी

    अयोध्येत 22 जानेवारीला होणाऱ्या राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचे निमंत्रण काँग्रेसने फेटाळून लावले आहे. काँग्रेसने राम मंदिराच्या उद्घाटनाला भाजप आणि आरएसएसचा कार्यक्रम म्हणत सहभागी होण्यास नकार दिला आहे. मात्र काँग्रेस हायकमांडच्या या निर्णयावर पक्षातील काही ज्येष्ठ नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.Congress rejected the invitation to inaugurate the Ram temple leaders are upset with the decision of the high command



    गुजरात काँग्रेसचे आमदार अर्जुन मोधवाडिया यांनी आक्षेप घेतला आहे. मोधवाडिया यांनी सोशल नेटवर्किंग साइट X वरील त्यांच्या एका पोस्टमध्ये लिहिले आहे की भगवान श्री राम हे आराध्य देव आहेत. हा देशवासीयांच्या श्रद्धेचा विषय आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसने असे राजकीय निर्णय घेण्यापासून दूर व्हायला हवे होते.

    त्याचवेळी काँग्रेसचे दिग्गज नेते आचार्य प्रमोद यांनीही पक्ष हायकमांडच्या या निर्णयावर असहमती व्यक्त केली आहे. त्यांनी सोशल मीडिया साइटवर लिहिले उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील

    “राम मंदिराच्या ‘प्राण प्रतिष्ठा’ सोहळ्याचे निमंत्रण काँग्रेसने नाकारल्याबद्दल काँग्रेस नेते आचार्य प्रमोद कृष्णम म्हणाले की, राम मंदिर आणि प्रभू राम सर्वांचे आहेत. काँग्रेस हा हिंदूविरोधी पक्ष नाही, काँग्रेस राम विरोधी नाही. हे काही लोक आहेत ज्यांनी असा निर्णय घेण्यात भूमिका बजावली आहे. या निर्णयामुळे पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांची मनं दुखावली आहेत. निमंत्रण न स्वीकारणे हे अत्यंत दुःखद आणि वेदनादायक आहे.”

    Congress rejected the invitation to inaugurate the Ram temple leaders are upset with the decision of the high command

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Malappuram : केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडूत एनआयएचे १९ ठिकाणी छापे; मलप्पुरम स्फोटकसाठा प्रकरणात मोठी कारवाई

    Jacqueliene Fernandez : जॅकलिन फर्नांडिस आणि सुकेश चंद्रशेखर यांना मोठा धक्का; २०० कोटींच्या मनी लॉन्डरिंग प्रकरणात आरोप निश्चित करण्याचे न्यायालयाचे आदेश

    Supreme Court : वन्यजीव जंगलातच सुरक्षित; सुरक्षित वातावरणातून प्राण्यांना हटवणे म्हणजे क्रूरता, सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वाची टिप्पणी