विशेष प्रतिनिधी
न्यूयॉर्क : म्यानमारमध्ये फेब्रुवारीपासून लष्कर आणि आंदोलक यांच्यात सुरु असलेल्या संघर्षामुळे सुमारे १० हजार जण भारत आणि थायलंडमध्ये पळून गेले आहेत. म्यानमारमधील स्थितीबाबतचा ठराव संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत आज मंजूर झाला. म्यानमारसह ११९ देशांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले, तर फक्त बेलारुसने ठरावाच्या विरोधात मतदान केले. शिवाय, भारत, बांगलादेश, भूतान, चीन, नेपाळ, लाओ आणि थायलंड हे शेजारी देश, तसेच रशिया यांनी मतदानात भाग घेतला नाही. Condition in Myanmar worsoned
‘म्यानमारमधील परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत असून जनता भयाच्या वातावरणात रहात आहे. त्यांच्या मूलभूत गरजाही पूर्ण होत नाहीत. आंतरराष्ट्रीय समुदायाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने नगारिकांनी आता स्वत:चेच सशस्त्र गट तयार केले असून सशस्त्र संघटनांकडून ते प्रशिक्षण घेत आहेत. गेल्या अनेक दशकांमध्ये जिथे संघर्ष झाला नव्हता, तिथेही संघर्षाचे वातावरण आहे. अशा परिस्थितीमुळे देशभरात, विशेषत: चीन, भारत आणि थायलंडच्या सीमेला लागून असलेल्या गावांमधील नागरिकांचे लोंढे शेजारच्या देशांमध्ये जात आहेत.’’
Condition in Myanmar worsoned
महत्त्वाच्या बातम्या
- आम आदमी पार्टीचा पंजाबचा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार शीख समुदायातून असेल; अरविंद केजरीवालांची घोषणा
- नवी मुंबई विमानतळ नामकरणाच्या वादात राज ठाकरे उतरले; नाव छत्रपती शिवाजी महाराजांचेच असावे, म्हणाले…!!
- ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही, मंत्री विजय वडेट्टीवारांचा इशारा
- उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या कार्यक्रमातील गर्दी, राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगतापांना अटक