प्रसिद्ध निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी गोवा भेटीदरम्यान सांगितले की, भारतीय जनता पक्ष (भाजप) पुढील अनेक दशके भारतीय राजकारणात शक्तिशाली राहील. IPACचे प्रमुख प्रशांत किशोर मानतात की, भाजपशी अजूनही “अनेक दशके” लढावे लागेल. या वर्षाच्या सुरुवातीला बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील टीएमसीला राज्यात सत्तेत राहण्यास मदत केल्यावर निवडणूक रणनीतीकार म्हणून प्रशांत किशोर यांची प्रसिद्धी वाढली. BJP will remain powerful for decades says Prashant Kishor in Goa
वृत्तसंस्था
पणजी : प्रसिद्ध निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी गोवा भेटीदरम्यान सांगितले की, भारतीय जनता पक्ष (भाजप) पुढील अनेक दशके भारतीय राजकारणात शक्तिशाली राहील. IPACचे प्रमुख प्रशांत किशोर मानतात की, भाजपशी अजूनही “अनेक दशके” लढावे लागेल. या वर्षाच्या सुरुवातीला बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील टीएमसीला राज्यात सत्तेत राहण्यास मदत केल्यावर निवडणूक रणनीतीकार म्हणून प्रशांत किशोर यांची प्रसिद्धी वाढली.
प्रशांत किशोर हे सध्या गोव्यात आहेत आणि टीएमसीला तिथे पाय रोवण्यास मदत करत आहेत. येत्या काही दशकांत भाजपच्या मजबूत उपस्थितीचा अंदाज व्यक्त करत किशोर यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला. किशोर म्हणाले की, ते (राहुल गांधी) या भ्रमात होते की नरेंद्र मोदींची सत्ता संपुष्टात येणे फक्त थोडा वेळ लागेल.
प्रशांत किशोर म्हणाले की, येत्या दशकांत भाजप राजकारणाच्या केंद्रस्थानी असणार आहे. मग ते जिंकले किंवा हरले तरीही. अगदी पहिल्या 40 वर्षात काँग्रेसची अवस्था तशीच होती. भाजप कुठेही जाणार नाही. जर तुम्हाला राष्ट्रीय स्तरावर 30 टक्के मते मिळाली तर तुम्ही इतक्यात कुठेही जात नाहीत. गोव्यात आयोजित एका कार्यक्रमात ते म्हणाले की, तुम्हाला वाटत असेल की लोक संतापले आणि मोदींना सत्तेतून बाहेर फेकून देतील, तर अशा भ्रमात पडू नका. भाजप कुठेही जाणार नाही. तुम्हाला पुढील काही दशके यासाठी लढावे लागेल.
राहुल गांधींची अडचण
किशोर म्हणाले की, अडचण राहुल गांधींची आहे. कदाचित त्यांना असे वाटत असेल की लोक त्यांना (नरेंद्र मोदी) सत्तेतून हाकलून देतील. पण असे होणार नाहीये. जोपर्यंत तुम्ही त्यांची ताकद तपासत नाही आणि चाचणी घेत नाही तोपर्यंत तुम्ही त्यांचा पराभव करू शकत नाही, असेही ते म्हणाले. किशोर म्हणाले की, लोकांची समस्या ही आहे की ते त्यांची (नरेंद्र मोदी) ताकद समजून घेण्यासाठी वेळ देत नाहीत, त्यांना काय लोकप्रिय बनवत आहे. जर तुम्हाला हे माहिती असेल तरच तुम्ही त्यांचा प्रतिकार करू शकता.
एक तृतीयांश लोक भाजपसोबत आहेत
काँग्रेस पक्ष नरेंद्र मोदी आणि भाजपचे भवितव्य कसे पाहतो, यावर किशोर म्हणाले, “तुम्ही जा आणि कोणत्याही काँग्रेस नेत्याशी किंवा कोणत्याही प्रादेशिक नेत्याशी बोला, ते म्हणतील, ही फक्त वेळ आहे.” ते म्हणतात की लोक कंटाळले आहेत आणि सरकारच्या विरोधातील लाटेमुळे ते त्यांना सत्तेतून बाहेर फेकून देतील. किशोर म्हणाले की, मला याबाबत शंका आहे. असे होत नाहीये. प्रशांत किशोर यांनी विखुरलेल्या मतदारांकडे बोट दाखवत म्हटले की, एक तृतीयांश लोक भाजपला मतदान करत आहेत किंवा भाजपला पाठिंबा देऊ इच्छितात.”
दोन तृतीयांश मतदारांचे तुकडे झाले
समस्या अशी आहे की दोन तृतीयांश मतदार इतके विखुरलेले आहेत की ते 10, 12 किंवा 15 राजकीय पक्षांमध्ये विभागले गेले आहेत. काँग्रेसच्या पडझडीला हेच कारण आहे. ६५ टक्के व्होटबँक तुटली आणि काँग्रेसचा पाठिंबा गेला. छोट्या छोट्या पक्षांमध्ये विभागले गेले आहे. बंगालमधून पक्षाला पुढे जाण्यासाठी IPAC ने गोव्यात टीएमसीच्या वतीने सर्वेक्षण सुरू केले आहे. गोव्यात, TMCने निवडणुकीत पक्षाचे नेतृत्व करण्यासाठी काँग्रेसचे माजी सदस्य लुइझिन्हो फालेरो यांना उमेदवारी दिली आहे.
BJP will remain powerful for decades says Prashant Kishor in Goa
महत्त्वाच्या बातम्या
- SAMEER WANKHEDE : समीर वानखेडेंच्या आई-बहिण यानंतर आता वडिलांनाही ओढले वादात ! नवाब मलिक म्हणतात ‘ज्ञानदेव’ की ‘दाऊद’ ?पोस्ट केला आणखी एक फोटो
- वसुली हा विरोधकांचा एकमेव धंदा; स्मृती इराणी यांची दादरा नगर हवेलीत प्रचार सभेत शिवसेनेवर टीका
- बांगलादेशात सोशल मिडीयावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याची हिंदू-मुस्लीम आरोपींची कबुली
- काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांची शोध मोहीम पंधराव्या दिवशीही सुरूच