• Download App
    रामाविना अयोध्या, अयोध्याच नाही, राष्टपती रामनाथ कोविंद यांचे प्रतिपादन|Ayodhya without Rama, not Ayodhya, the statement of President Ramnath Kovind

    रामाविना अयोध्या, अयोध्याच नाही राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे प्रतिपादन

    विशेष प्रतिनिधी

    लखनौ : अयोध्या ही प्रभूरामचंद्रांची जन्मभूमी आहे. श्रीरामाविना अयोध्या हा विचारही करू शकत नाही, असे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले. रामाविना अयोध्या ही अयोध्या कशी असू शकेल. जिथे प्रभू रामचंद्र तीच अयोध्या… अयोध्या हीच श्रीरामांची नगरी आहे अणि हीच ती नगरी आहे, असेही ते म्हणाले.Ayodhya without Rama, not Ayodhya, the statement of President Ramnath Kovind

    राष्ट्रपतींनी अयोध्येला भेट दिली आणि रामलल्लाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी राममंदिरासाठी सुरू असलेल्या बांधकामाचीही पाहणी केली. आपल्या नावाचा संदर्भ देऊन राष्टपती म्हणाले, माझ्या आईवडिलांनी जेव्हा माझे नाव ठेवले, तेव्हा त्यांच्या मनातही रामाविषयी अपार श्रद्धा होती. राम या नावाचे असंख्य लोक आहेत. कारण, या प्रत्येकांच्या माता-पित्यांची रामावर श्रद्धा आहे.



    श्रीराम आणि अयोध्या हे परस्परांपासून वेगळे असूच शकत नाही. राम म्हणजेच अयोध्या आणि अयोध्या म्हणजेच राम होय. अयोध्येत श्रीरामाचे भव्य मंदिर व्हावे, ही कोट्यवधी नागरिकांची इच्छा होती आणि आता ती पूर्ण होत आहे, असेही राष्ट्रपतींनी सांगितले.

    अयोध्या या नावातच शक्तीकेंद्र आहे, रघुवंशी राजांचे सत्ताकेंद्र असल्यामुळे हे नाव आजही औचित्यपूर्ण आहे, असे सांगताना राष्ट्रपती म्हणाले की, श्रीरामांना आदिवासींबाबत विशेष स्नेह होता. त्यांच्या वनवासाच्या काळात त्यांनी युद्धाकरिता अयोध्या आणि मिथिलेची सेना बोलावली नव्हती, तर भिल्ल आणि वानरांना एकत्र करून त्यांची सेना तयार केली होती.

    Ayodhya without Rama, not Ayodhya, the statement of President Ramnath Kovind

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Dr. Manmohan Singh : माजी CEC चा दावा, मनमोहन म्हणाले होते- मी आत्महत्या करेन; कुरेशी म्हणाले– माजी पीएमचे बोलणे ऐकून मी आश्चर्यचकित झालो होतो

    उझबेकिस्तानातील वैद्यकीय विद्यार्थिनीच्या मृत्यूची राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली स्वतःहून दखल

    Delayed Monsoon : देशात शेती असलेल्या भागात दुष्काळाचे सावट; निम्म्या भारतात तुटीच्या पावसाने खरीप पेरण्या 21% पिछाडीवर, महाराष्ट्रावरही चिंतेचे ढग