प्रतिनिधी
नवी दिल्ली : काश्मिरी हिंदूंच्या भयानक नरसंहाराचे वास्तव मांडणारा सिनेमा “द काश्मीर फाईल्स”ची लोकप्रियता जशी वाढते आहे, तसा त्याला “जमियत ए पुरोगामी” कडून होणारा विरोधही वाढतो आहे. तरी देखील “द काश्मीर फाईल्स” आपली घोडदौड 100 कोटी क्लबच्या दिशेने सुरू ठेवली आहे. आज 16 मार्च 2022 रोजी “द काश्मीर फाईल्स”ने कमाईचा 60 कोटी रुपयांचा आकडा ओलांडला आहे. सिनेमा विरुद्ध “फिल्म जिहाद” सुरू होऊन देखील हा विक्रम स्पृहणीय आहे…!!After Goa, Maharashtra, Delhi too Film Jihad but cinema earned 60 crores
दिल्लीत “फिल्म जिहाद”; पोलीसांचा विशेष बंदोबस्त
देशात सध्या प्रत्येकाच्या तोंडात एकाच सिनेमाचे नाव आहे. एकीकडे हा सिनेमा करमुक्त करण्याची मागणी होत आहे तर दुसरीकडे या सिनेमावर बंदी घालावी, अशी मागणी देखील केली जात आहे. त्यामुळे “द कश्मीर फाइल्स” हा चित्रपट प्रदर्शित झाल्याने दोन्ही समुदायांमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने सर्व जिल्ह्यांच्या डीसीपींना दोन्ही समुदायांचे लोक राहत असलेल्या भागात सुरक्षा व्यवस्था कडक करण्याच्या सूचना दिल्या आहेत. विशेषत: महिला पोलीस, पीसीआर आणि वाहतूक पोलीस कर्मचारीही तेथे तैनात केले पाहिजेत.
स्पेशल सेल ब्रँचच्या पत्रात काय म्हटले?
विवेक अग्निहोत्रीचा ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट ११ मार्चला प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट काश्मिरी पंडितांच्या जीवनावर आणि वास्तविक घटनांवर आधारित आहे. यामध्ये काश्मिरी हिंदूंच्या क्रूरतेचे चित्रण करण्यात आले आहे. काही लोक चित्रपटाला एकतर्फी असल्याचे सांगूत त्याला विरोध करत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. काही सिनेमागृहांमध्ये हिंसक घोषणाबाजीही झाल्याचे दिसले, असे स्पेशल सेल ब्रँचने लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
स्पेशल ब्रँचचे पत्र
फेब्रुवारी 2020 मध्ये ईशान्य दिल्लीत भीषण दंगली झाल्या आहेत असून हिजाबबाबत अजूनही वाद सुरू असून हरिद्वार धर्म संसदेत एका समुदायाच्या विरोधात बोलले गेले आहे. छोटीशी घटनाही दोन्ही समाजात तेढ निर्माण करू शकते हे नाकारता येणार नाही. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची भीती आहे. जिथे एक समुदाय या चित्रपटाच्या विरोधात आहे आणि त्यावर बंदी घालण्याची मागणी करत आहे. तर दुसरीकडे हा चित्रपट देशभरात करमुक्त करण्याची मागणी इतर समाजाकडून होत आहे, असे या स्पेशल सेल ब्रँचने लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
बंदोबस्त वाढविण्याच्या सूचना
यासह असेही म्हटले की, या प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेता दिल्लीतील सर्व जिल्ह्यांमध्ये कायदा आणि सुव्यवस्था मजबूत करणे आवश्यक आहे. हे लक्षात घेऊन सर्व जिल्हा डीसीपींनी आपापल्या भागात दोन्ही समाजातील लोक राहत असलेल्या ठिकाणी अधिकाधिक पोलीस बंदोबस्त ठेवावा. अशा ठिकाणी पीसीआर आणि वाहतूक पोलीसही तैनात करावेत.
After Goa, Maharashtra, Delhi too Film Jihad but cinema earned 60 crores
महत्त्वाच्या बातम्या
- भटक्या विमुक्त समाजासाठी बांधलेल्या सदनिकांमध्ये 200 कोटीची फसवणुक – 218 सदनिकांची केली परस्पर विक्री
- Goa Chief Minister : विश्वजित राणे राज्यपालांना भेटले; डॉ. प्रमोद सावंत पंतप्रधान मोदींना भेटले…!!, कोण होणार मुख्यमंत्री??, अजून कुणाला प्रश्न पडलाय??
- झुलन गोस्वामी अडीचशे विकेट्स पूर्ण करणारी पहिली गोलंदाज
- महाविकास आघाडीचा दट्ट्या : चंद्रशेखर बावनकुळेंची महावितरण कामांप्रकरणी होणार चौकशी!!