• Download App
    'नीती आयोग रद्द करा', ममता बॅनर्जींनी पंतप्रधान मोदींसोबत बैठकीपूर्वी केली मोठी मागणी Abolish Niti Aayog Mamata Banerjee made a big demand before her meeting with PM Modi

    ‘नीती आयोग रद्द करा’, ममता बॅनर्जींनी पंतप्रधान मोदींसोबत बैठकीपूर्वी केली मोठी मागणी

    यादरम्यान ममता बॅनर्जी यांनी आगामी विधानसभा निवडणुकीबाबत वक्तव्य केले आहे Abolish Niti Aayog Mamata Banerjee made a big demand before her meeting with PM Modi

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : NITI आयोगाची गव्हर्निंग कौन्सिलची बैठक शनिवारी (27 जुलै 2024) दिल्ली येथे होणार आहे, ज्याचे अध्यक्ष देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे असतील. याबाबत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही दिल्ली गाठली आहे. या बैठकीच्या एक दिवस आधी, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नीती आयोग रद्द करण्याबद्दल बोलल्या आहेत.

    ममता बॅनर्जी म्हणाल्या, “नीती आयोग रद्द करा आणि योजना आयोग परत आणा. योजना आयोग ही नेताजी बोस यांची कल्पना होती. हे सरकार आपसातील भांडणाताच पडेल, जरा थांबा. या दौऱ्यात माझ्याकडे जास्त वेळ नाही, त्यामुळे मी बोलणार नाही. कोणत्याही नेत्याला भेटू शकत नाही.



    यादरम्यान ममता बॅनर्जी यांनी आगामी विधानसभा निवडणुकीबाबत वक्तव्य केले आहे. त्या म्हणाल्या, “बंगालमध्ये भाजपचा सूर्य मावळत आहे. महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंची महाविकास आघआडी जिंकेल. हरियाणामध्ये भाजपचा पराभव होईल आणि हेमंत सोरेन झारखंडमध्ये पुन्हा विजयी होतील.”

    केंद्रीय मंत्री सुकांता मजुमदार यांच्या उत्तर बंगालबद्दलच्या टिप्पणीवर ममता बॅनर्जी म्हणाल्या, “प्रत्येक राज्याच्या स्वतःच्या प्राधान्यक्रम आहेत, पण माझा संघराज्यावर विश्वास आहे. भाजपला देश तोडायचा आहे. त्यांचे नेते विभाजनाबद्दल बोलत आहेत.”

    Abolish Niti Aayog Mamata Banerjee made a big demand before her meeting with PM Modi

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Dhan-Dhanya Krishi Yojana : केंद्राची पंतप्रधान धन-धान्य कृषी योजनेला मंजुरी; कमी कृषी उत्पादन असलेल्या 100 जिल्ह्यांवर लक्ष; 1.7 कोटी शेतकऱ्यांना फायदा

    RBI Governor : सरकार व्याजदरात आणखी कपात करू शकते; RBI गव्हर्नर म्हणाले- GDP डेटामध्ये मंदी असल्यास कमी केले जाऊ शकतात व्याजदर

    CDS Anil Chauhan : सीडीएस म्हणाले- कालच्या शस्त्रांनी तुम्ही आजचे युद्ध जिंकू शकत नाही; सुरक्षेसाठी गुंतवणूक गरजेची