विशेष प्रतिनिधी
डेहराडून – उत्तराखंडमधील जलप्रलयात मरण पावलेल्यांची संख्या ४६ वर पोचली असून आणखी अकरा जण बेपत्ता आहेत. राज्यात अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले असल्याचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी सांगितले.46 peopels died in Uttarakhand due to rain
अतिवृष्टीमुळे रानीखेत आणि अल्मोडा येथे मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाले असून या दोन्ही भागांचा राज्याशी असलेला संपर्क पूर्णपणे तुटला आहे. नैनीताल येथे अडकून पडलेल्या सर्व पर्यटकांची सुटका करण्यात आली आहे. आपत्ती निवारण पथकाच्या जवानांनी तब्बल दीड हजारांपेक्षाही अधिक लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्याचे काम केले आहे.
येथील जनजीवन पूर्वपदावर येण्यासाठी आणखी बराच अवधी लागेल, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. राज्य सरकारकडून जिल्हा पातळीवर पुनर्वसनासाठी प्रत्येकी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून या निधीच्या वाटपाचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यातील पाऊस थांबला असून पुढील आठवडा कोरडा जाण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी पूर आणि अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर भूस्खलन होऊन वित्तहानी झाली आहे.
46 peopels died in Uttarakhand due to rain
महत्त्वाच्या बातम्या
- विज्ञानाची गुपिते : कोलेस्टेरॉलचे असेही मोलाचे महत्व
- विज्ञानाचे डेस्टीनेशन्स : चांदीचे असेही व्यापक परिणाम
- मेंदूचा शोध व बोध : मानसिक आजाराकडे दुर्लक्ष नको
- मनी मॅटर्स : तात्काळ खरेदी करु नका.
- लाईफ स्किल्स : इतरांपेक्षा वेगळे काहीतरी करा
- आर्यन खानची बेल नाकारण्यात आल्यानंतर शाहरुख खान, सलमान खान, अक्षय कुमार, सैफ अली खान यांचा ‘हा’ फोटो होतोय व्हायरल