• Download App
    उत्तराखंडमधील जलप्रलयात मरण पावलेल्यांची संख्या पोचली ४६ वर |46 peopels died in Uttarakhand due to rain

    उत्तराखंडमधील जलप्रलयात मरण पावलेल्यांची संख्या पोचली ४६ वर

    विशेष प्रतिनिधी

    डेहराडून – उत्तराखंडमधील जलप्रलयात मरण पावलेल्यांची संख्या ४६ वर पोचली असून आणखी अकरा जण बेपत्ता आहेत. राज्यात अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले असल्याचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी सांगितले.46 peopels died in Uttarakhand due to rain

    अतिवृष्टीमुळे रानीखेत आणि अल्मोडा येथे मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाले असून या दोन्ही भागांचा राज्याशी असलेला संपर्क पूर्णपणे तुटला आहे. नैनीताल येथे अडकून पडलेल्या सर्व पर्यटकांची सुटका करण्यात आली आहे. आपत्ती निवारण पथकाच्या जवानांनी तब्बल दीड हजारांपेक्षाही अधिक लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्याचे काम केले आहे.



    येथील जनजीवन पूर्वपदावर येण्यासाठी आणखी बराच अवधी लागेल, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. राज्य सरकारकडून जिल्हा पातळीवर पुनर्वसनासाठी प्रत्येकी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून या निधीच्या वाटपाचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

    हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यातील पाऊस थांबला असून पुढील आठवडा कोरडा जाण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी पूर आणि अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर भूस्खलन होऊन वित्तहानी झाली आहे.

    46 peopels died in Uttarakhand due to rain

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ओवैसींच्या चिंतेत भर, भाजपच्या माधवी लता मुस्लिमांमध्येही प्रचंड लोकप्रिय, हैदराबादेत आव्हान

    शिवराज सिंह चौहान यांना केंद्रात मोठी जबाबदारी मिळण्याची चिन्हं!

    2 – 0 आघाडी : फुटबॉलच्या परिभाषेत पंतप्रधान मोदींनी कोल्हापूरकरांना समजावला विजयाचा फॉर्म्युला!!