• Download App
    जन आशीर्वाद यात्रा बिनघोर सुरू; नारायण राणे यांचे चिपळूणात जोरदार स्वागत। Narayan Rane`s Jan Ashirwad Yatra reached in chiplun amid political tension between Shiv Sena and BJP

    जन आशीर्वाद यात्रा बिनघोर सुरू; नारायण राणे यांचे चिपळूणात जोरदार स्वागत

    विशेष प्रतिनिधी

    चिपळूण : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या विरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर शिवसेना आणि भाजपमध्ये जो राजकीय तणाव निर्माण झालाय, त्या पार्श्वभूमीवर नारायण राणेंची जन आशीर्वाद यात्रा बिनघोर सुरू असून त्यांचे चिपळूणात भव्य स्वागतही करण्यात आले. Narayan Rane`s Jan Ashirwad Yatra reached in chiplun amid political tension between Shiv Sena and BJP

    नारायण राणे यांनी तत्परतेने एका पाठोपाठ एक ट्विट करून चिपळूणमधील कार्यक्रमांची माहिती आणि फोटो शेअर केलेत. जन आशीर्वाद यात्रेच्या पाचव्या दिवशी चिपळूणच्या बहादूरशेख नाका येथे नगराध्यक्षा सौ. सुरेखा खेराडे, शहराध्यक्ष श्री. आशिष खातू, खेर्डी ग्रामपंचायत तसेच मुस्लिम समाजातर्फे स्वागत करण्यात आले व डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पार्पण करून मानवंदना दिली, असे नारायण राणे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.



    तसेच चिपळूणमध्ये महाराष्ट्राच्या संकट काळात ज्या योध्यांनी खंबीर उभे राहून देवदूतासारखी मदत केली त्या सर्वांचे आभार व्यक्त करत सत्कार केले, तसेच पेढे परशुराम ग्रामस्थांचे निवेदन स्वीकारले, अशी माहिती नारायण राणे यांनी दुसऱ्या ट्विटमधून दिली.

    गुन्हाच केलेला नाही, ठाकरे सरकारला आव्हान

    -माझ्यावर सरकारने चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल केले आहेत. मी केंद्रीय मंत्री आहे, माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून बेकायदेशीर पद्धतीने गुन्हे दाखल करणे हा राजद्रोह आहे. राज्य सरकारने सुडाचे राजकारण करू नये, असा इशारा नारायण राणे यांनी आपल्या तिसऱ्या ट्विटमधून दिला.

    Narayan Rane`s Jan Ashirwad Yatra reached in chiplun amid political tension between Shiv Sena and BJP

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Baramati Bypoll 2026 : बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसची माघार; हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती; तरीही निवडणूक बिनविरोध नाहीच, 23 उमेदवार रिंगणात

    CBSE Class : सहावीच्या वर्गात याच सत्रापासून 3 भाषा शिकवल्या जातील; सध्या पुस्तके उपलब्ध नाहीत; तरीही CBSE ने सांगितले- निर्देश 7 दिवसांत लागू करा

    Sanjay Raut : संजय राऊत म्हणाले- नीच कृत्य करणाऱ्यांना जात-धर्म नसतो; खरात अन् एरंडे हिंदू आहेत म्हणून संघटना गप्प का?