वृत्तसंस्था
मुंबई : मध्यरात्रीपासून पडणाऱ्या पावसाने मुंबई महापालिकेच्या पावसाळ्याच्या तयारीची पुरती पोलखोल केली आहे. मुंबईची तुंबई करून टाकली आहे. आज दिवसभरही हवामान खात्याने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. Mumbai: Water-logging at Mumbai’s Gandhi Market area as the city continues to receive heavy rainfall
गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने रायगड, तळकोकणाला झोडपून काढल्यानंतर मुंबईत पावसाची संततधार सुरू आहे. मुंबई आणि उपनगरात काल रात्रीपासूनच जोरदार पाऊस सुरू असून अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले आहे. पुढील २४ तासांत मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा तर काही ठिकाणी अतितीव्र पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
सायन रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे रूळांवर पाणी साचून लोकल वाहतूकीला फटका बसला आहे. कुर्ला-विद्याविहार स्थानकादरम्यान रेल्वे रुळांवर पाणी साचले आहे. त्यामुळे मध्य आणि हार्बर रेल्वेची वाहतूक २०- २५ मिनिटे उशीराने होत आहे.
कोकणात सिंधुदुर्ग तिलारी धरण क्षेत्रातील कॉजवे पाण्याखाली; पाच गावाचा संपर्क तुटला, पुरस्थिती कायम आहे. रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांमध्ये अनेक नद्यांना पूर आला आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरीतही पावसाची संततधार सुरूच आहे.
Mumbai: Water-logging at Mumbai’s Gandhi Market area as the city continues to receive heavy rainfall
महत्त्वाच्या बातम्या
- कोविडचा धोका;पंतप्रधानांची सहा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी आज चर्चा; उध्दव ठाकरेही सहभागी होणार
- भटक्या विमुक्तांचे स्वतंत्र लोकसंख्येवर आधारित सामाजिक व आर्थिक सर्वेक्षण करणार – मंत्री विजय वडेट्टीवार यांची माहिती
- ITI साठी प्रवेशप्रक्रिया सुरू : ९६६ आयटीआयमध्ये १ लाख ३६ हजार जागा उपलब्ध, नवाब मलिक यांची माहिती
- West Bengal Violence : NHRC ने रिपोर्टमध्ये म्हटले- रेप आणि हत्येच्या प्रकरणांची CBI चौकशी व्हावी, राज्याच्या बाहेर चालावेत खटले
- कोरोना काळात मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचे उत्तम काम, वडिलांप्रमाणे भूमिका निभावली; पवारांकडून कौतूक; दादा भुसेंची माहिती