• Download App
    कोरोना संकट : नगर जिल्ह्याची वाढली चिंता ! आणखी ८ गावांमध्ये जाहीर केला लॉकडाऊनCorona crisis: Increased concern of Nagar district! Lockdown announced in 8 more villages

    कोरोना संकट : नगर जिल्ह्याची वाढली चिंता ! आणखी ८ गावांमध्ये जाहीर केला लॉकडाऊन

    जिल्हाधिकाऱ्यांच्या ६९ गावांमध्ये लॉकडाऊन या निर्णयाला खासदार सुजय विखे-पाटील यांनी कडाडून विरोध पुकारला आहे.Corona crisis: Increased concern of Nagar district! Lockdown announced in 8 more villages


    विशेष प्रतिनिधी

    अहदनगर : राज्यातील अनेक जिल्ह्यांत करोनाचा संसर्ग घटत असताना नगर जिल्ह्यात मात्र चिंता कायम आहे. नगर जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट ५ टक्के आहे. त्यामुळे ३ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील १० पेक्षा जास्त उपचाराधीन रुग्ण असलेल्या ६१ गावांत कडक लॉकडाऊन करण्यात आला होता .आता या ६१ गावांमध्ये आणखी ८ गावांना लॉकडाऊन जाहीर केला आहे.त्यामुळे लॉकडाऊन असलेल्या गावांची संख्या आता ६९ झाली आहे.



    या आठ गावांची पडली भर

    या आठ गावांमध्ये संगमनेर तालुक्यातील राजापूर, पिंप्री लौकी, आजमपूर, नेवासा तालुक्यातील चांदा, पारनेरमधील निघोज, वाडेगव्हाण, टाकळी ढोकेश्वर, अळकुटी आणि शेवगावमधील वडुले बु. या गावांचा समावेश आहे.

    लॉकडाऊनवर प्रतिक्रिया

    जिल्हाधिकाऱ्यांच्या ६९ गावांमध्ये लॉकडाऊन या निर्णयाला खासदार सुजय विखे-पाटील यांनी कडाडून विरोध पुकारला आहे. तर, पारनेरसह अनेक ठिकाणच्या व्यापाऱ्यांनीही निर्बंधांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

    Corona crisis: Increased concern of Nagar district! Lockdown announced in 8 more villages

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Shashikant Shinde : राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा विषय संपलाय, शरद पवार गटाच्या बैठकीनंतर शशिकांत शिंदेंचे मोठे विधान

    CM Devendra Fadnavis : मोदींवर विनाकारण टीका नको, पवारांचे विधान महत्त्वाचे; विधान परिषद महायुती एकत्रित लढणार, इंधनाचा तुटवडा नाही, जनतेने घाबरू नये- सीएम फडणवीस

    Chhagan Bhujbal : राज्यात 1 महिना पुरेल एवढाच इंधन साठा; अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची माहिती; विरोधकांची स्थिती स्पष्ट करण्याची मागणी